शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

ई-बसमधून देताहेत ई-लर्निंगचे धडे

By admin | Updated: May 26, 2014 02:41 IST

माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव -  माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे हेच माहिती-तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे ही निकड ओळखून संजीवनी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ‘ई-बस’ ही नवी संकल्पना घेऊनत्यांनी संगणक विद्यार्थ्यांच्या दारातच नेऊन ठेवले आहे, तेही मोफत. आतापर्यंत १७ शाळांमधील १३०० विद्यार्थी संगणक साक्षर झाले आहे़ ‘संजीवनी तंत्रज्ञान आपल्या दारी, चला करू या मैत्री तंत्रज्ञानाशी’ हे ब्रिद घेऊन सहा महिन्यांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या संकल्पनेतून ई-बसचा जन्म झाला़ वीस लॅपटॉप, प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्शन असा कॉम्प्युटर लॅबसारखा सेटअप असलेली ‘संजीवनी ई-बस’ सज्ज झाली़ प्रा़ वैभव परजणे यांच्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली़ आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बेसिक कॉम्प्युटर आॅपरेशन, वर्ड, पॉवर पॉइंट, हार्डवेअरची माहिती, ई-मेल अकाउंट तयार करणे, इंटरनेटवर एखाद्या विषयाची माहिती उपलब्ध करून घेणे याबाबतची माहिती ‘संजीवनी ई-बस’च्या माध्यमातून दिली जाते़ आजवर कोपरगाव तालुक्यातील १७ शाळांमधील १३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले तेही मोफत़ पाठ्यपुस्तकाशिवाय संगणकाचे ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक खूश आहेत़ इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी हा विषय आहे़ परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत़ त्यामुळे ‘संजीवनी ई-बस’चा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे़