शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

दिग्नी-जयगडमार्ग जिंदाल कंपनीच चालविणार, शापूरजी पालनजी कंपनीची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 05:40 IST

कोकण रेल्वेवरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चिपळूण-कराड रेल्वेमार्ग खासगीकरणातून परवडणारा नसल्याचे व्यवहार्यता अहवालातून सिद्ध झाल्याने त्या स्पर्धेतून शापूरजी पालनजी कंपनीने माघार घेतली आहे. यामुळे आता हा प्रकल्प कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र शासन संयुक्त भागीदारीतून करणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. कोकण रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर ते खास लोकमतशी बोलत होते.

- नारायण जाधवठाणे : कोकण रेल्वेवरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चिपळूण-कराड रेल्वेमार्ग खासगीकरणातून परवडणारा नसल्याचे व्यवहार्यता अहवालातून सिद्ध झाल्याने त्या स्पर्धेतून शापूरजी पालनजी कंपनीने माघार घेतली आहे. यामुळे आता हा प्रकल्प कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र शासन संयुक्त भागीदारीतून करणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. कोकण रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर ते खास लोकमतशी बोलत होते. या प्रकल्पाचा निम्मा खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र शासनाने दर्शवली आहे. तसेच जयगड ते दिग्नी हा दुसरा एका मार्ग पूर्णत: जिंदाल स्टील ही खासगी कंपनी चालवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी कारवार विभागाचे महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ खान, मुख्य जनसंपर्क अधिकारी एल.के. वर्मा, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर उपस्थित होते.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला गोवा, दक्षिण भारताशी रेल्वेमार्गाने जोडण्याच्या दृष्टीने चिपळूण ते कराड हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. याद्वारे तिन्ही प्रदेशांतील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. मालवाहतूक लवकर आणि स्वस्तात करणे शक्य होणार आहे.कोकण रेल्वेमार्गावरील १०४ किमीचा मार्ग खासगीकरणातून पीपीपी तत्त्वावर बांधण्याचा करारनामा मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाला होता. यात ७४ टक्के हिस्सा खासगी कंपनीचा अर्थात शापूरजी पालनजी यांचा आणि २६ टक्के हिस्सा कोकण रेल्वेचा राहील, असे ठरले होते. यावर शापूरजी पालनजी कंपनी ३२०० कोटी खर्चून हा रेल्वेमार्ग बांधणार होती. यातून पश्चिम महाराष्ट्राला कोकणातील जयगड, आंगरे, विजयदुर्ग, दिग्नी, रेवस, दिघी या बंदरांना जोडणे शक्य होणार होते. परंतु, फिजिबिलिटी अर्थात प्रकल्प व्यवहार्यता अहवालातून पुढे आलेल्या बाबींमुळे शापूरजी पालनजी कंपनीने तो करण्यास नकार देऊन यातून माघार घेतली आहे.पीपीपीतून हा प्रकल्प शक्य नसल्याचे समोर आल्यावर ही बाब कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि कोकण रेल्वे ५०-५० भागीदारीतून करणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासन ४५० कोटींची मदत देणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वेवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्पकोकण रेल्वेवरील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ७७१ कोटींचा दिग्नी ते जयगड मार्ग होय. २३ किमीचा मार्ग जिंदाल स्टील, कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून बांधण्यात येत आहे. यासाठी जयगड-दिग्नी रेल लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. यात सर्वात मोठा वाटा जिंदाल कंपनीचा असल्याने तो पूर्णत: तेच चालवणार आहेत. यातून जयगड पोर्टला रत्नागिरीनजीकच्या दिग्नी या रेल्वे स्थानकाशी जोडून बंदरात येणाºया किंवा बंदरातून जाणाºया मालवाहतुकीची ने-आण करणे शक्य होणार आहे. वार्षिक १२ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची ने-आण करता येणार आहे.या दोन मार्गांसह गोव्यातील बाळ्ळी लॉजिस्टिक पार्कमुळे कोकण रेल्वेद्वारे दक्षिण भारतासह गोवा आणि महाराष्ट्रातील बहुतेक बंदरे एकमेकांशी जोडली जाणार असल्याने नजीकच्या भविष्यात मालवाहतुकीवरील खर्चात मोठी बचत होणार असून रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन संभाव्य अपघातांना आळा बसणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड