शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2016 22:04 IST

११ वीच्या वर्गात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी रविवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास गेले

ऑनलाइन लोकमतअहमदपूर, दि. 25 - अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी रविवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.महात्मा गांधी विद्यालयात अबरार अहमद निसार शेख (वय १६, रा़ भाग्यनगर, अहमदपूर), मंगेश राजकुमार बावणे (वय १६, रा़ लातूररोड) व अमत प्रकाश सिंघवी हे तिघेजण ट्युशनचा वर्ग सुटल्यानंतर रविवारी दुपारी स्कूटीवरून थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते़ अबरार अहमद निसार शेख व मंगेश राजकुमार बावणे हे दोघेच तलावात उतरले़ तर अमत सिंघवी हा पोहता येत नसल्यामुळे पाळूवर बसून होता़ पोहत असताना अचानक अबरार आणि राजकुमार पाण्यात बुडू लागले़ दरम्यान, अमतने आरडा ओरड केली़ यावेळी तलावानजीक असलेले गणेश केंद्रे, अंगद मुंडे धावून आले़ या दोघांनी बुडत असलेल्या अबरार व मंगेशला वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत हे दोघेही पाण्यात खोलवर बुडाले होते.दरम्यान, अहमदपूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले़ रियाज पठाण, अजितकुमार, प्रकाश जाधव, कैलास सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तलावातील पाण्यातून अबरार शेख आणि राजकुमार बावणे या दोघांचे प्रेत बाहेर काढले. अहमदपूर येथील ग्रामीण रूग्णालयात प्रेतांचे शवविच्छेदन करण्यात आले़ याबाबत अहमदपूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़