शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंद काळात परराज्यातील निकृष्ट भाजी मुंबईकरांच्या माथी

By admin | Updated: June 9, 2017 05:01 IST

शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला. टोमॅटो, फ्लॉवर व इतर सडक्या भाज्याही जादा दराने विकण्यात आल्या. दोन दिवसांपासून आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले असून, खराब झालेल्या टोमॅटो व इतर भाज्यांचे ढिगारे बाजार समितीमध्ये पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हमीभावासह प्रलंबित मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा २ जूनपासून मुंबईकरांना फटका बसला. राज्यातून कृषी माल विक्रीसाठी येणार नसल्याने व्यापाऱ्यांनी गुजरात, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेशामधून जो माल उपलब्ध होईल तो विक्रीसाठी मागविला होता. कर्नाटक व गुजरातमधून सर्वात जास्त आवक होऊ लागली होती. मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव प्रचंड वाढले. याचा गैरफायदा घेऊन परराज्यातील व्यापाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचा मालही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला. विशेषत: कर्नाटकमधून सडलेले टोमॅटो विक्रीला आले. कर्नाटकमधून मुंबईमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रकला २४ तासांचा प्रवास करावा लागतो. त्यापूर्वी एक दिवस अगोदर शेतामधून माल काढण्यात येतो. पॅक केलेला हलक्या दर्जाचा माल येथे येईपर्यंत पूर्ण खराब होऊ लागला होता. चांगल्या मालाच्या क्रेटमध्ये खराब माल ठेवण्यात आल्याने किरकोळ विक्रेत्यांनी तो खरेदी करून ग्राहकांना विकला. कमी प्रतीचा टोमॅटो किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपये किलोने विकला गेला.बंद काळात मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, सातारा परिसरातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पुणे व सोलापूरमधील चांगल्या दर्जाचा टोमॅटो विक्रीसाठी येत असून त्याला भाव मिळत नव्हता. >राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान७ जूनपासून मुंबईमध्ये पुणे, नाशिक व राज्याच्या इतर भागातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. परंतु आवक वाढल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला असून त्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. कमी दराने माल विकावा लागत असून विक्री न झालेला व खराब झालेला माल फेकावा लागत आहे. संप सुरू झाल्यापासूनची आवक दिनांकआवक टोमॅटो फ्लॉवर२ जून५७१४२६३ जून१०९९६७७७५ जून१७१५३३०१५१६ जून१३५९१९२११८७ जून२२४०५६९३५४८ जून१९८७४१५२८५>गुरुवारची राज्यनिहाय आवकराज्यआवक (ट्रक)महाराष्ट्र४२३कर्नाटक१३गुजरात३१दिल्ली१७मध्य प्रदेश१२उत्तर प्रदेश१४तामिळनाडू६आंध्र प्रदेश५शेतकरी बंदच्या काळात तुटवडा असल्याने परराज्यातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होता. भाव चांगला मिळत असल्याने खराब मालही काही प्रमाणात विक्रीसाठी पाठविण्यात आला. वाहतुकीदरम्यान काही माल खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. - शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, मुंबई एपीएमसी