शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

बंद काळात परराज्यातील निकृष्ट भाजी मुंबईकरांच्या माथी

By admin | Updated: June 9, 2017 05:01 IST

शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला. टोमॅटो, फ्लॉवर व इतर सडक्या भाज्याही जादा दराने विकण्यात आल्या. दोन दिवसांपासून आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले असून, खराब झालेल्या टोमॅटो व इतर भाज्यांचे ढिगारे बाजार समितीमध्ये पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हमीभावासह प्रलंबित मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा २ जूनपासून मुंबईकरांना फटका बसला. राज्यातून कृषी माल विक्रीसाठी येणार नसल्याने व्यापाऱ्यांनी गुजरात, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेशामधून जो माल उपलब्ध होईल तो विक्रीसाठी मागविला होता. कर्नाटक व गुजरातमधून सर्वात जास्त आवक होऊ लागली होती. मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव प्रचंड वाढले. याचा गैरफायदा घेऊन परराज्यातील व्यापाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचा मालही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला. विशेषत: कर्नाटकमधून सडलेले टोमॅटो विक्रीला आले. कर्नाटकमधून मुंबईमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रकला २४ तासांचा प्रवास करावा लागतो. त्यापूर्वी एक दिवस अगोदर शेतामधून माल काढण्यात येतो. पॅक केलेला हलक्या दर्जाचा माल येथे येईपर्यंत पूर्ण खराब होऊ लागला होता. चांगल्या मालाच्या क्रेटमध्ये खराब माल ठेवण्यात आल्याने किरकोळ विक्रेत्यांनी तो खरेदी करून ग्राहकांना विकला. कमी प्रतीचा टोमॅटो किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपये किलोने विकला गेला.बंद काळात मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, सातारा परिसरातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पुणे व सोलापूरमधील चांगल्या दर्जाचा टोमॅटो विक्रीसाठी येत असून त्याला भाव मिळत नव्हता. >राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान७ जूनपासून मुंबईमध्ये पुणे, नाशिक व राज्याच्या इतर भागातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. परंतु आवक वाढल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला असून त्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. कमी दराने माल विकावा लागत असून विक्री न झालेला व खराब झालेला माल फेकावा लागत आहे. संप सुरू झाल्यापासूनची आवक दिनांकआवक टोमॅटो फ्लॉवर२ जून५७१४२६३ जून१०९९६७७७५ जून१७१५३३०१५१६ जून१३५९१९२११८७ जून२२४०५६९३५४८ जून१९८७४१५२८५>गुरुवारची राज्यनिहाय आवकराज्यआवक (ट्रक)महाराष्ट्र४२३कर्नाटक१३गुजरात३१दिल्ली१७मध्य प्रदेश१२उत्तर प्रदेश१४तामिळनाडू६आंध्र प्रदेश५शेतकरी बंदच्या काळात तुटवडा असल्याने परराज्यातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होता. भाव चांगला मिळत असल्याने खराब मालही काही प्रमाणात विक्रीसाठी पाठविण्यात आला. वाहतुकीदरम्यान काही माल खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. - शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, मुंबई एपीएमसी