शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्यामुळे राक्षसभुवनचे शनी महाराज पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:24 IST

बीड जिल्ह्यात पावसाची जवळपास ३१ टक्के तूट आहे आणि तेथील शेतकरी वरुणराजाची वाट पाहून थकले आहेत.

- सखाराम शिंदे गेवराई (जि.बीड) : बीड जिल्ह्यात पावसाची जवळपास ३१ टक्के तूट आहे आणि तेथील शेतकरी वरुणराजाची वाट पाहून थकले आहेत. असे असले, तरी सोमवारी गोदावरी नदी दुथडी वाहिली आणि गेवराई तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले. जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तुडुंब वाहत असलेल्या या नदीचे हे रूपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.शनीच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनी महाराज यांच्या मूर्ती अर्ध्या बुडाल्या आहेत.तालुक्यातील ३२ गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूलचे पथक तयार असल्याचे तहसीलदार धोंडीबा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जायकवाडी धरणातून सोमवारी दुपारी ६,८२९ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले.