शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

By admin | Updated: June 27, 2016 02:06 IST

दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे.

पेण : दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे. खारभूमी क्षेत्रातील ९३ गावांची शेतीमधील केलेली धूळ पेरणीचा पाहणी दौरा पेण तालुका कृषी विभागाने नुकताच केला असता तब्बल ९०० हेक्टर क्षेत्रावरील धूळ पेरणीची अवस्था बिकट झाली असल्याचे अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या पथकाला आढळले. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने सादर केला असल्याचे तालुका कृषी कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. यामुळे पेणच्या खारभूमी क्षेत्रातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे नवे संकट कोसळले आहे. खारभूमी क्षेत्रातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. दरवर्षी ही समस्या कायम उद्भवते. मात्र गतवर्षी पाऊस टप्प्याटप्प्याने पडल्याने खारभूमी शेतीतील पेरणी वाचली व पीक चांगले आले होते. यावर्षीचा जूनच्या प्रारंभी ११ जून रोजी एकदाच पडलेला मृग नक्षत्रातील पाऊस नंतर १३ दिवस दांडी मारून हजर झाला. खारभूमी क्षेत्रातील केलेली भात पेरणी भिजून नंतर पावसाचा शिडकावा न झाल्याने भात बियाणाचे अंकुर फुटले नसून या बियाणाला बुरशीची लागण होवून संपूर्ण केलेला पेरा वाया गेला. चांगल्या प्रतवारी असलेल्या जमिनीत भाताचे नर्सरी रोपे चांगली बहरली दिसत असताना, खारभूमी क्षेत्रातील शिवारात ओसाड परिस्थिती दिसत होती. याबाबत शेतकरीवर्गाने तालुका कृषी विभागाकडे या बाबतीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लक्ष वेधले असता तालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. यामधील ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी तालुका कृषी विभागाने करून भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल ठाणे विभागीय कृषी संचालक यांना ठाणे येथील बैठकीत सादर केला आहे.यावर्षीचा पाऊस चांगला होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून धूळ पेरणी केली होती. आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगला पडत असल्याचे डोळ्यादेखत दिसत असतानाच खारभूमी क्षेत्रातील ९०० हेक्टरवर असा दुबार पेरणीसाठी बियाणांची शोध मोहिमेची लगबग सुरु आहे. शासनाने यासाठी तातडीची प्रासंगिक मदत म्हणून बियाणे व खते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी आहे. (वार्ताहर)> तालुका कृषी विभागाचा अहवाल सादरतालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. तालुका कृषी विभागाने भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल दिला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. त्यापैकी ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी के ली.