शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

By admin | Updated: June 27, 2016 02:06 IST

दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे.

पेण : दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे. खारभूमी क्षेत्रातील ९३ गावांची शेतीमधील केलेली धूळ पेरणीचा पाहणी दौरा पेण तालुका कृषी विभागाने नुकताच केला असता तब्बल ९०० हेक्टर क्षेत्रावरील धूळ पेरणीची अवस्था बिकट झाली असल्याचे अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या पथकाला आढळले. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने सादर केला असल्याचे तालुका कृषी कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. यामुळे पेणच्या खारभूमी क्षेत्रातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे नवे संकट कोसळले आहे. खारभूमी क्षेत्रातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. दरवर्षी ही समस्या कायम उद्भवते. मात्र गतवर्षी पाऊस टप्प्याटप्प्याने पडल्याने खारभूमी शेतीतील पेरणी वाचली व पीक चांगले आले होते. यावर्षीचा जूनच्या प्रारंभी ११ जून रोजी एकदाच पडलेला मृग नक्षत्रातील पाऊस नंतर १३ दिवस दांडी मारून हजर झाला. खारभूमी क्षेत्रातील केलेली भात पेरणी भिजून नंतर पावसाचा शिडकावा न झाल्याने भात बियाणाचे अंकुर फुटले नसून या बियाणाला बुरशीची लागण होवून संपूर्ण केलेला पेरा वाया गेला. चांगल्या प्रतवारी असलेल्या जमिनीत भाताचे नर्सरी रोपे चांगली बहरली दिसत असताना, खारभूमी क्षेत्रातील शिवारात ओसाड परिस्थिती दिसत होती. याबाबत शेतकरीवर्गाने तालुका कृषी विभागाकडे या बाबतीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लक्ष वेधले असता तालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. यामधील ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी तालुका कृषी विभागाने करून भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल ठाणे विभागीय कृषी संचालक यांना ठाणे येथील बैठकीत सादर केला आहे.यावर्षीचा पाऊस चांगला होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून धूळ पेरणी केली होती. आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगला पडत असल्याचे डोळ्यादेखत दिसत असतानाच खारभूमी क्षेत्रातील ९०० हेक्टरवर असा दुबार पेरणीसाठी बियाणांची शोध मोहिमेची लगबग सुरु आहे. शासनाने यासाठी तातडीची प्रासंगिक मदत म्हणून बियाणे व खते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी आहे. (वार्ताहर)> तालुका कृषी विभागाचा अहवाल सादरतालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. तालुका कृषी विभागाने भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल दिला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. त्यापैकी ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी के ली.