शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

डहाणूत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 29, 2016 03:07 IST

तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत.

शौकत शैख,

डहाणू- तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत. २६ जून २००२ च्या प्रलयाची आठवण करून देत २६ जूनला एकाच दिवशी चक्क २५१ मी.मीटर पाऊस पडला तर २७ जूनला सकाळी उघडीप देईल असे वाटत असतानाच दुपार पासून तुफान पावसाला सुरु वात झाली. मंगळवारच्या सकाळ पर्यंतच्या २४ तासात ११४.६ मी.मीटर पावसाची नोंद झाली तर आठवडा भरात ६५५.३ मी.मीटर, पाऊस पडला हा पाऊस धमणी धरण,कवडास बंधारा आणि साखरे बांधाऱ्यात क्षेत्रातही पडल्यामुळे ते बऱ्यापैकी भरले आहे.सुरवातीलाच पाऊस सुरू होताच उतावीळ होऊन ज्या शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले त्यांची मात्र या सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचाईत झाली आहे. पेरलेल्या भातावर कायमचे पाणी साचून राहिल्याने त्याचे कोंब कुजू लागले आहेत. तर काही दडपून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार भात पेरणीचे संकट ओढावले आहे. या वर्षीही भातशेती वाया जाते की काय ? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. अद्यापही वेधशाळेने दोन तीन दिवस असाच पाऊस कोसळेल असा इशारा दिल्याने बळीराजाची अवस्था आणखीज बिकट झाली आहे.आज संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसाने कंक्र ाडीपूल वाणगाव येथील डी.जे फॅक्टरी आणि वरोर येथील बंधारा रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद पडली त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. व स्थानिकांचेही प्रचंड हाल झाले.>जव्हारमध्ये धुवाँधार ; जनजीवन विस्कळीत; धबधब्यांवर तरुणाई उसळलीगेल्या काही दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने शुक्रवार पासून धुवाँधार सुरवात केलेली असून सोमवार पर्यत जोरदार पडणाऱ्या धो-धो पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पासून पडणाऱ्या पावसाने थोडाही वेळ उघडीप दिलेली नसल्यामुळे नागरीक कंटाळून घराबाहेर निघालेले नाहीत. रस्ते ओस पडलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी नांगरणी करण्यास सुरवातही केलेली आहे.धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भक्कम बांधलेली स्लॅबची घरेही गळायला लागली आहेत, त्यातून ही पाण्याची धार सुरू आहे. तर खेडो पाड्यातील आदिवासींच्या कुडाच्या, पत्र्यांच्या, कौलाच्या घराचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. जिकडे तिकडे नाले, नद्या, बंधारे भरून वाहू लागले आहेत. खेडोपाड्यातून येणाऱ्या- जाणाऱ्या रस्त्यांवर, मोऱ्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही खेडोपाड्यांचा संपर्क तुटला आहे. संततधार सुरू असल्याने शेतकरी ही दुविधेत पडले आहेत. शेतीसाठी पाऊस पाहिजे परंतु तो नियमीत असावा, अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. दरम्यान जव्हार शहर हे पर्यटन स्थळ असल्याने आणि पावसाळ्यात येथे दाभोसा, हिरडपाडा, काळमांडवी, खडखड, हनुमानपॉर्इंट, सनसेट पाँर्इंट, डॅम, जयविलास पॅलेस अशी विविध पर्यटन स्थळे असल्यामुळे पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटकांची विविध पॉइंटवर गर्दी दिसत आहे. ह्या निर्सगरम्य वातावरणात पर्यटक आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे शहरात गटारे तुंबल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.