शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: August 23, 2016 02:35 IST

महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने १३६ कुटुंबीयांची गैरसोय होत असून हा प्रश्न तत्काळ मिटला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. चोवीस तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका असा नवी मुंबईचा देशभर लौकिक आहे. यासाठी पालिकेने केंद्र शासनाचे पुरस्कारही मिळविले आहेत. मालकीचे धरण असल्याने पुढील ५० वर्षे पाणी टंचाई भासणार नाही असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पावसाळ्यातही पिण्यापुरते पाणी उपलब्ध होत नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी पुरविण्याची योजना आखली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये एकूण सदनिका व प्रत्येक सदनिकेमध्ये ५ व्यक्ती गृहीत धरून पाणी सोडले जात आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये सरासरी १३५ प्रमाणेही पाणी मिळत नाही. याशिवाय सोसायटीच्या टेरेसवरील टाकीतून पाणी सोडले की तळमजल्यावरील नागरिकांना जास्त पाणी मिळते. त्या तुलनेमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. या वस्तुस्थितीकडे व तांत्रिक अडचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेरूळमधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये १३६ सदनिका आहेत. पालिकेच्या सुधारित नियमाप्रमाणे सोसायटीला रोज ९१८०० लिटर पाणी मिळाले पाहिजे. परंतु १ ते १५ आॅगस्ट पर्यंत १३८० युनिट पाणी मिळणे आवश्यक असताना फक्त ८४८ युनिट पाणी मिळाले आहे. ५३२ युनिट पाणी कमी मिळाले आहे. एव्हरग्रीन सोसायटीमधील पदाधिकारी महादेव पवार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की उन्हाळ्यामध्ये धरणात पाणी नसल्याचे कारण देवून पाणी कपात करण्यात आली. परंतु पावसाळ्यात धरणातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली असतानाही नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. प्रशासनाने कागदावर केलेले नियोजन बरोबर असले तरी त्यांनी एकदा प्रत्यक्ष नागरिकांशी बोलून वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. स्थानिक नगरसेविका सुजाता सूरज पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>महासभेत उमटणार पडसाद युवक राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आहे. प्रशासन नागरिकांची अडवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले जाणार आहे. एव्हरग्रीनमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी नियमित पाठपुरावा केला असून या समस्येचे पडसाद आता सर्वसाधारण उमटणार असून यानंतरही मार्ग निघाला नाही तर नागरिक हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.