शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: August 23, 2016 02:35 IST

महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने १३६ कुटुंबीयांची गैरसोय होत असून हा प्रश्न तत्काळ मिटला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. चोवीस तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका असा नवी मुंबईचा देशभर लौकिक आहे. यासाठी पालिकेने केंद्र शासनाचे पुरस्कारही मिळविले आहेत. मालकीचे धरण असल्याने पुढील ५० वर्षे पाणी टंचाई भासणार नाही असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पावसाळ्यातही पिण्यापुरते पाणी उपलब्ध होत नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी पुरविण्याची योजना आखली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये एकूण सदनिका व प्रत्येक सदनिकेमध्ये ५ व्यक्ती गृहीत धरून पाणी सोडले जात आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये सरासरी १३५ प्रमाणेही पाणी मिळत नाही. याशिवाय सोसायटीच्या टेरेसवरील टाकीतून पाणी सोडले की तळमजल्यावरील नागरिकांना जास्त पाणी मिळते. त्या तुलनेमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. या वस्तुस्थितीकडे व तांत्रिक अडचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेरूळमधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये १३६ सदनिका आहेत. पालिकेच्या सुधारित नियमाप्रमाणे सोसायटीला रोज ९१८०० लिटर पाणी मिळाले पाहिजे. परंतु १ ते १५ आॅगस्ट पर्यंत १३८० युनिट पाणी मिळणे आवश्यक असताना फक्त ८४८ युनिट पाणी मिळाले आहे. ५३२ युनिट पाणी कमी मिळाले आहे. एव्हरग्रीन सोसायटीमधील पदाधिकारी महादेव पवार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की उन्हाळ्यामध्ये धरणात पाणी नसल्याचे कारण देवून पाणी कपात करण्यात आली. परंतु पावसाळ्यात धरणातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली असतानाही नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. प्रशासनाने कागदावर केलेले नियोजन बरोबर असले तरी त्यांनी एकदा प्रत्यक्ष नागरिकांशी बोलून वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. स्थानिक नगरसेविका सुजाता सूरज पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>महासभेत उमटणार पडसाद युवक राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आहे. प्रशासन नागरिकांची अडवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले जाणार आहे. एव्हरग्रीनमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी नियमित पाठपुरावा केला असून या समस्येचे पडसाद आता सर्वसाधारण उमटणार असून यानंतरही मार्ग निघाला नाही तर नागरिक हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.