शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: August 23, 2016 02:35 IST

महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने १३६ कुटुंबीयांची गैरसोय होत असून हा प्रश्न तत्काळ मिटला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. चोवीस तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका असा नवी मुंबईचा देशभर लौकिक आहे. यासाठी पालिकेने केंद्र शासनाचे पुरस्कारही मिळविले आहेत. मालकीचे धरण असल्याने पुढील ५० वर्षे पाणी टंचाई भासणार नाही असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पावसाळ्यातही पिण्यापुरते पाणी उपलब्ध होत नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी पुरविण्याची योजना आखली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये एकूण सदनिका व प्रत्येक सदनिकेमध्ये ५ व्यक्ती गृहीत धरून पाणी सोडले जात आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये सरासरी १३५ प्रमाणेही पाणी मिळत नाही. याशिवाय सोसायटीच्या टेरेसवरील टाकीतून पाणी सोडले की तळमजल्यावरील नागरिकांना जास्त पाणी मिळते. त्या तुलनेमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. या वस्तुस्थितीकडे व तांत्रिक अडचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेरूळमधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये १३६ सदनिका आहेत. पालिकेच्या सुधारित नियमाप्रमाणे सोसायटीला रोज ९१८०० लिटर पाणी मिळाले पाहिजे. परंतु १ ते १५ आॅगस्ट पर्यंत १३८० युनिट पाणी मिळणे आवश्यक असताना फक्त ८४८ युनिट पाणी मिळाले आहे. ५३२ युनिट पाणी कमी मिळाले आहे. एव्हरग्रीन सोसायटीमधील पदाधिकारी महादेव पवार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की उन्हाळ्यामध्ये धरणात पाणी नसल्याचे कारण देवून पाणी कपात करण्यात आली. परंतु पावसाळ्यात धरणातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली असतानाही नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. प्रशासनाने कागदावर केलेले नियोजन बरोबर असले तरी त्यांनी एकदा प्रत्यक्ष नागरिकांशी बोलून वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. स्थानिक नगरसेविका सुजाता सूरज पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>महासभेत उमटणार पडसाद युवक राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आहे. प्रशासन नागरिकांची अडवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले जाणार आहे. एव्हरग्रीनमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी नियमित पाठपुरावा केला असून या समस्येचे पडसाद आता सर्वसाधारण उमटणार असून यानंतरही मार्ग निघाला नाही तर नागरिक हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.