शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाणीटंचाईमुळे उडाला ‘हगणदरीमुक्ती’चा फज्जा!

By admin | Updated: May 5, 2016 03:04 IST

प्यायलाच नाही पाणी, शौचालयात कुठून टाकणार? : खारपाणपट्टय़ात तीव्र पाणीटंचाई.

अतुल जयस्वाल/अकोला पाणीटंचाईचे संकट यंदा राज्यात जवळपास सर्वत्रच आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोगणती पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे. या पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हगणदरीमुक्त गावाच्या अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयामध्ये कुठून टाकणार, अशी भूमिका घेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी आता शौचविधीसाठी पुन्हा 'बाहेर'चा मार्ग पत्करल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये 'हगणदरीमुक्ती'चा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १६८ गावे हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठेवले होते. मार्च २0१६ अखेरपर्यंत यापैकी ६८ गावे हगणदरीमुक्त करण्यात यश मिळाले. ग्रामपंचायतींनीही ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करून घरोघरी वैयक्तिक शौचालय बांधण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त केले. जिल्ह्यात हगणदरीमुक्त अभियानास बर्‍यापैकी प्रतिसाद मिळून ६८ गावे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली. गतवर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. जलस्रोत आटल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्‍या गावांमध्ये तर अभूतपूर्व जलसंकट निर्माण झाले. प्यायला पाणी मिळणेही दुरापास्त झाले. या सर्व बाबींचा परिणाम हगणदरीमुक्त अभियानवर झाल्याचे चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, तिथे शौचालयात टाकण्यासाठी पाणी कुठून आणणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ शौचविधीसाठी गावाबाहेरील रस्ता, माळरान किंवा नदीकाठाचा वापर करताना दिसून येत आहेत.