शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

मुंबई विमानतळावरील एकाच धावपट्टीमुळे विकासदर घटला : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:51 IST

मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे येथे पर्यटक, प्रवासी कमी येतात. क्षमतेअभावी मोठी मागणी असूनही अनेक आंतराष्ट्रीय विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी देता येत नाही.

मुंबई : मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे येथे पर्यटक, प्रवासी कमी येतात. क्षमतेअभावी मोठी मागणी असूनही अनेक आंतराष्ट्रीय विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे विकासदरावर परिणाम झाला आहे. नवी मुंबई विमानतळामुळे हा ताण कमी होणार असून राज्याचा विकासदर सुधारेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रलंबित असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विक्रम काळे, किरण पावसकर, हेमंत टकले, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी विचारला होता. मुख्यमंत्री म्हणाले की, या विमानतळाचा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. प्रकल्पाचे दोन टप्पे आहेत. त्यात प्री-डेव्हलपमेंट वर्क आणि प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम, अशी कामे आहेत. प्री-डेव्हलपमेंटमध्ये डोंगर कापणे,नदीचा प्रवाह बदलणे आणि जमिनीत भराव टाकणे आदी कामे आहेत. त्यानंतर जमीन सपाट होण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. ही कामे झाल्याशिवाय मुख्य काम सुरू करता येत नाही. त्यामुळे या कामाच्या निविदा काढून त्याचे कार्यादेशही दिले आहेत.हे काम दीड वर्ष चालणार आहे. प्रत्यक्ष कामासाठी दोन बोली मिळाल्या असून त्याला प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलाजावणी समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.