शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

महसूल खात्यातील पदांमुळे राज्यातील बदल्यांचे घोडे अडले, दहा दिवसांपासून घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 04:44 IST

राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते.

- राजेश निस्तानेयवतमाळ - राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी करावयाच्या बदल्यांबाबत १६ जानेवारीच्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनीही ७ फेब्रुवारीपूर्वी बदल्यांचे आदेश जारी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. परंतु गुरुवारी, ७ तारीख उजाडत असूनही बदल्यांचा घोळ संपलेला नाही. निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बदल्या कराव्या की नाही, यावर संपूर्ण राज्यातील बदल्यांचे घोडे अडले आहे. दुष्काळ, पाणीटंचाई असल्याने निवासी उपजिल्हाधिकाºयांची बदली करू नये असा प्रशासनातील सूर आहे. तर त्या जागेवर दुसरा अधिकारी आला तर उपरोक्त समस्या सहज हाताळू शकेल, त्यामुळे आरडीसींची बदली करा, असा प्रशासनातील दुसºया गटाचा सूर आहे. एक तर उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयाची (डेप्युटी डीईओ) बदली करू नये आणि केलीच तर त्या अधिकाºयाला दुसºया जिल्ह्यात समकक्ष पदावर दिले जावे, असा आग्रह आहे. त्यानंतरही गेली दहा दिवस लोटूनही बदल्यांचा घोळ संपलेला नाही. आपल्या सोईने बदली होते की नाही हे पाहण्यासाठी कित्येक अधिकारी दहा दिवसांपासून मुंबईत येरझारा मारत आहे. तर कुणी तेथे ठाण मांडून बसलेले आहेत.२००९च्या पुनरावृत्तीची भीती२००९ मध्ये विभागीय महसूल आयुक्तांनी मंत्रालयात पाठविलेल्या बदल्यांच्या प्रस्तावामध्ये प्रचंड खाडाखोड करून सोईने नावे बदलविली गेली होती. बदल्यांचे आदेश जारी होऊन अधिकारी नव्या ठिकाणी रुजू व्हायला निघाले. दरम्यान निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्याने आयोगाने आयुक्तांचे प्रस्ताव कायम ठेवले. त्यामुळे अनेक अधिकाºयांचे आदेश फिरवावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती या वेळीही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :TransferबदलीMumbaiमुंबई