शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल खात्यातील पदांमुळे राज्यातील बदल्यांचे घोडे अडले, दहा दिवसांपासून घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 04:44 IST

राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते.

- राजेश निस्तानेयवतमाळ - राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी करावयाच्या बदल्यांबाबत १६ जानेवारीच्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनीही ७ फेब्रुवारीपूर्वी बदल्यांचे आदेश जारी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. परंतु गुरुवारी, ७ तारीख उजाडत असूनही बदल्यांचा घोळ संपलेला नाही. निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बदल्या कराव्या की नाही, यावर संपूर्ण राज्यातील बदल्यांचे घोडे अडले आहे. दुष्काळ, पाणीटंचाई असल्याने निवासी उपजिल्हाधिकाºयांची बदली करू नये असा प्रशासनातील सूर आहे. तर त्या जागेवर दुसरा अधिकारी आला तर उपरोक्त समस्या सहज हाताळू शकेल, त्यामुळे आरडीसींची बदली करा, असा प्रशासनातील दुसºया गटाचा सूर आहे. एक तर उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयाची (डेप्युटी डीईओ) बदली करू नये आणि केलीच तर त्या अधिकाºयाला दुसºया जिल्ह्यात समकक्ष पदावर दिले जावे, असा आग्रह आहे. त्यानंतरही गेली दहा दिवस लोटूनही बदल्यांचा घोळ संपलेला नाही. आपल्या सोईने बदली होते की नाही हे पाहण्यासाठी कित्येक अधिकारी दहा दिवसांपासून मुंबईत येरझारा मारत आहे. तर कुणी तेथे ठाण मांडून बसलेले आहेत.२००९च्या पुनरावृत्तीची भीती२००९ मध्ये विभागीय महसूल आयुक्तांनी मंत्रालयात पाठविलेल्या बदल्यांच्या प्रस्तावामध्ये प्रचंड खाडाखोड करून सोईने नावे बदलविली गेली होती. बदल्यांचे आदेश जारी होऊन अधिकारी नव्या ठिकाणी रुजू व्हायला निघाले. दरम्यान निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्याने आयोगाने आयुक्तांचे प्रस्ताव कायम ठेवले. त्यामुळे अनेक अधिकाºयांचे आदेश फिरवावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती या वेळीही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :TransferबदलीMumbaiमुंबई