शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

'रिमोट कंट्रोल निकामी झाल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 12:20 PM

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते.

मुंबई - आतापर्यंत एकही निवडणूक न लढविता महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. रिमोट कंट्रोल निकामी झाल्यामुळेच युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे निवडणूक लढवित असल्याचा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. रिमोट कंट्रोलने राजकारण हाताळत असल्याचा आरोप शिवसेनेवर नेहमीच करण्यात येतो. यावरच ओवेसी यांनी सेनेला टोला लगावला आहे.

ठाकरे घराण्यात निवडणूक लढविण्याची परंपरा नाही, असा दावा याआधी ठाकरे कुटुबींयाकडून करण्यात येत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेच नव्हे तर राज ठाकरे यांनी देखील आजपर्यंत निवडून लढवली नाही. परंतु, आता आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत कधीही निवडणूक न लढविणारे ठाकरे घराणे यावेळी विधानसभा लढविणार आहे. त्यामागे आदित्य यांना उपमुख्यमंत्री करण्याची शिवसेनेची योजना आहे. मात्र यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.याआधी ‘मातोश्री’तून रिमोटद्वारे सत्ता चालविण्याची ठाकरे कुटुंबीयांची पद्धत होती. मात्र आता रिमोट निकामी झाले आहे. रिमोट व्यवस्थीत काम करत नसल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा टोला ‘एमआयएम’चे प्रमुख असोदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते. परंतु, मुख्यमंत्री बदलानंतर नारायण राणे रिमोटप्रमाणे काम करू शकले नाही, असंही राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत. त्यानंतर शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. मात्र आता खुद्द आदित्य ठाकरेच निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेनेची सुत्र हाती घेणार असं दिसत आहे.