शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

'रिमोट कंट्रोल निकामी झाल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 12:22 IST

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते.

मुंबई - आतापर्यंत एकही निवडणूक न लढविता महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. रिमोट कंट्रोल निकामी झाल्यामुळेच युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे निवडणूक लढवित असल्याचा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. रिमोट कंट्रोलने राजकारण हाताळत असल्याचा आरोप शिवसेनेवर नेहमीच करण्यात येतो. यावरच ओवेसी यांनी सेनेला टोला लगावला आहे.

ठाकरे घराण्यात निवडणूक लढविण्याची परंपरा नाही, असा दावा याआधी ठाकरे कुटुबींयाकडून करण्यात येत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेच नव्हे तर राज ठाकरे यांनी देखील आजपर्यंत निवडून लढवली नाही. परंतु, आता आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत कधीही निवडणूक न लढविणारे ठाकरे घराणे यावेळी विधानसभा लढविणार आहे. त्यामागे आदित्य यांना उपमुख्यमंत्री करण्याची शिवसेनेची योजना आहे. मात्र यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.याआधी ‘मातोश्री’तून रिमोटद्वारे सत्ता चालविण्याची ठाकरे कुटुंबीयांची पद्धत होती. मात्र आता रिमोट निकामी झाले आहे. रिमोट व्यवस्थीत काम करत नसल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा टोला ‘एमआयएम’चे प्रमुख असोदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते. परंतु, मुख्यमंत्री बदलानंतर नारायण राणे रिमोटप्रमाणे काम करू शकले नाही, असंही राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत. त्यानंतर शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. मात्र आता खुद्द आदित्य ठाकरेच निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेनेची सुत्र हाती घेणार असं दिसत आहे.