शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

'रिमोट कंट्रोल निकामी झाल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 12:22 IST

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते.

मुंबई - आतापर्यंत एकही निवडणूक न लढविता महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. रिमोट कंट्रोल निकामी झाल्यामुळेच युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे निवडणूक लढवित असल्याचा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. रिमोट कंट्रोलने राजकारण हाताळत असल्याचा आरोप शिवसेनेवर नेहमीच करण्यात येतो. यावरच ओवेसी यांनी सेनेला टोला लगावला आहे.

ठाकरे घराण्यात निवडणूक लढविण्याची परंपरा नाही, असा दावा याआधी ठाकरे कुटुबींयाकडून करण्यात येत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेच नव्हे तर राज ठाकरे यांनी देखील आजपर्यंत निवडून लढवली नाही. परंतु, आता आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत कधीही निवडणूक न लढविणारे ठाकरे घराणे यावेळी विधानसभा लढविणार आहे. त्यामागे आदित्य यांना उपमुख्यमंत्री करण्याची शिवसेनेची योजना आहे. मात्र यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.याआधी ‘मातोश्री’तून रिमोटद्वारे सत्ता चालविण्याची ठाकरे कुटुंबीयांची पद्धत होती. मात्र आता रिमोट निकामी झाले आहे. रिमोट व्यवस्थीत काम करत नसल्यानेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा टोला ‘एमआयएम’चे प्रमुख असोदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.

1995 मध्ये युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले होते. त्यावेळी बाळासाहेब रिमोटद्वारे सरकार चालवतात, असे आरोप होत होते. परंतु, मुख्यमंत्री बदलानंतर नारायण राणे रिमोटप्रमाणे काम करू शकले नाही, असंही राजकीय विश्लेषक सांगत आले आहेत. त्यानंतर शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. मात्र आता खुद्द आदित्य ठाकरेच निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेनेची सुत्र हाती घेणार असं दिसत आहे.