शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘मरे’च्या पावसाळी अडचणी दूर होणार

By admin | Updated: January 30, 2016 01:23 IST

रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्यामुळे मध्य रेल्वे प्रत्येक वर्षी विस्कळीत होत असते. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून चार रोड ओव्हर ब्रीज आणि पादचारी

मुंबई : रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्यामुळे मध्य रेल्वे प्रत्येक वर्षी विस्कळीत होत असते. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून चार रोड ओव्हर ब्रीज आणि पादचारी पुलांवर (एफओबी) हातोडा चालवितानाच आणखी दोन रोड ओव्हर ब्रीजची (आरओबी) रुळांपासून उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यात पहिला हातोडा हा कर्नाक पुलावर पडणार असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे लोकल सेवेचा बोऱ्या वाजतो. यात काही पुलांच्या खांबांच्या अडथळ्यामुळे आणि त्या दरम्यानच असणाऱ्या ट्रॅकची उंची कमी असल्याने पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्वात जुन्या आणि कमी उंची असलेल्या आरओबी तसेच पादचारी पुलांवर हातोडा चालवितानाच ते नव्याने बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे काही आरओबीची ट्रॅकपासूनच उंची वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले, की मस्जीदजवळील कर्नाक आरओबी, भायखळ्यातील चामरलेन पादचारी पूल, कुर्ल्याजवळील स्वदेशी मिल पादचारी पुल आणि घाटकोपर पंतनगरजवळील पादचारी पूल तोडण्यात येतील. त्याऐवजी नवीन आरओबी आणि पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांची उंची वाढवितानाच ट्रॅकही वर उचलले जातील. त्याचबरोबर करी रोड आरओबी आणि टिळक ब्रीजचीही ट्रॅकपासून उंची वाढविण्यात येईल. त्यामुळे या सर्व पुलांखाली रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून लोकल गाड्यांना लादण्यात आलेले ताशी ३0 ते ५0 वेगाचे बंधन हटेल. यासाठी कर्नाक पुलावर प्रथम हातोडा पडणार आहे. (प्रतिनिधी)

कर्नाक पूल पाडण्यासाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात अजून अधिसूचना आम्ही जारी केलेली नाही. कारण हँकॉक पूल पाडण्यात आल्याने तेथील वाहतूक वळवण्यात आली आहे. या पुलावरील वाहतुकीचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाक पूल तोडायचा झाल्यास यावरील वाहतूक दुसरीकडून वळवावी लागेल आणि त्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे. - मिलिंद भारांबे, वाहतूक, सह पोलीस आयुक्त