शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘मरे’च्या पावसाळी अडचणी दूर होणार

By admin | Updated: January 30, 2016 01:23 IST

रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्यामुळे मध्य रेल्वे प्रत्येक वर्षी विस्कळीत होत असते. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून चार रोड ओव्हर ब्रीज आणि पादचारी

मुंबई : रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्यामुळे मध्य रेल्वे प्रत्येक वर्षी विस्कळीत होत असते. यातून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून चार रोड ओव्हर ब्रीज आणि पादचारी पुलांवर (एफओबी) हातोडा चालवितानाच आणखी दोन रोड ओव्हर ब्रीजची (आरओबी) रुळांपासून उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यात पहिला हातोडा हा कर्नाक पुलावर पडणार असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे लोकल सेवेचा बोऱ्या वाजतो. यात काही पुलांच्या खांबांच्या अडथळ्यामुळे आणि त्या दरम्यानच असणाऱ्या ट्रॅकची उंची कमी असल्याने पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्वात जुन्या आणि कमी उंची असलेल्या आरओबी तसेच पादचारी पुलांवर हातोडा चालवितानाच ते नव्याने बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे काही आरओबीची ट्रॅकपासूनच उंची वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले, की मस्जीदजवळील कर्नाक आरओबी, भायखळ्यातील चामरलेन पादचारी पूल, कुर्ल्याजवळील स्वदेशी मिल पादचारी पुल आणि घाटकोपर पंतनगरजवळील पादचारी पूल तोडण्यात येतील. त्याऐवजी नवीन आरओबी आणि पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांची उंची वाढवितानाच ट्रॅकही वर उचलले जातील. त्याचबरोबर करी रोड आरओबी आणि टिळक ब्रीजचीही ट्रॅकपासून उंची वाढविण्यात येईल. त्यामुळे या सर्व पुलांखाली रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून लोकल गाड्यांना लादण्यात आलेले ताशी ३0 ते ५0 वेगाचे बंधन हटेल. यासाठी कर्नाक पुलावर प्रथम हातोडा पडणार आहे. (प्रतिनिधी)

कर्नाक पूल पाडण्यासाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात अजून अधिसूचना आम्ही जारी केलेली नाही. कारण हँकॉक पूल पाडण्यात आल्याने तेथील वाहतूक वळवण्यात आली आहे. या पुलावरील वाहतुकीचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाक पूल तोडायचा झाल्यास यावरील वाहतूक दुसरीकडून वळवावी लागेल आणि त्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे. - मिलिंद भारांबे, वाहतूक, सह पोलीस आयुक्त