शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

एमआयएममुळे राष्ट्रवादी धास्तावली

By admin | Updated: November 5, 2016 03:36 IST

ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना आणि भाजपामध्ये इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत.

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना आणि भाजपामध्ये इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत. त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक इतर पक्षात जाऊन स्थिरावले आहेत. राष्ट्रवादीने हे फारसे मनावर घेतले नसले तरी एमआयएमने ओवेसी यांची दणदणीत सभा घेऊन मुंब्य्रात शिरकाव केल्याने राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते आहे. स्थानिक पातळीवर एमआयएमची संघटनात्मक बांधणी पुरेशी नाही, पक्षाचे पुरेसे बस्तान बसलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांनी पालिका निवडणुकीत एमआयएमचा फारसा प्रभाव जाणवणार नसल्याचा दावा केला आहे. मात्र यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी एमआयएमने लढत दिली आहे, तेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीलाच अधिक धक्का बसला आहे आणि शिवसेना, भाजपाचा फायदा झाला आहे. त्यामुळे मुंब्य्रात एमआयएम कितपत चालेल, यापेक्षाही त्यांच्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला किती धक्का बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत काही ठिकाणच्या जागा सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातही खरी लढत ही आता शिवसेना-भाजपामध्येच होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ताकद वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा, राबोडी आदी भागांवर लक्ष केंद्रीत करुन मागील निवडणुकीइतक्या जागा कशा येतील, त्याचे गणित आखले आहे. त्यानुसार त्यांनी या भागांवर लक्ष केंद्रीत करुन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यंदा कळव्यातून १६ आणि मुंब्य्रातून २० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. सध्या कळव्यात आणि मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आकडा चढा आहे. त्यावरच राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची मदार आहे. त्यांची हीच सोपी गणिते बिघडविण्यासाठी मुंब्य्रात एमआयएमने दमदार प्रवेश केला आहे. (प्रतिनिधी)>राष्ट्रवादीतील बंडखोरांवर नजरनिवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीला इतर पक्षांनी धक्का दिला असून चार नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हे चारही नगरसेवक पूर्वीपासूनच आमचे नव्हते, असा दावा जरी राष्ट्रवादीची मंडळी करत असली तरी त्यांच्या नाराजांच्या फळीतील नेमके कोण एमआयएमच्या तंबूत जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.>ध्रुवीकरण सेनेच्या पथ्यावर?एमआयएमचा फायदा भाजपाला होतो. प्रसंगी मतांचे ध्रुवीकरण शिवसेनेच्याही पथ्यावर पडते. त्यामुळे आताही त्यांनीच मागल्या दाराने एमआयएमला मैदानात उतरविल्याची चर्चा आहे. एमआयएम मुंब्रा आणि राबोडीत उमेदवार उभे करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याची दखल घ्यावी लागणार आहे. एमआयएमचे किती उमेदवार निवडून येतील याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी ते कोणाकोणाची गणिते बिघडवतात हे पाहणे महत्वाचे आहे.