शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

पावसाअभावी भात लागवडीला झाला उशीर

By admin | Updated: July 7, 2014 02:59 IST

कोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे.

सुरेश लोखंडे , ठाणेकोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे. जून महिन्यात सुमारे ४०० ते ५५० मिमी सरासरी पाऊस पडणाऱ्या या जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी केवळ १५९.६७ मिमी पाऊस पडला आहे. या वर्षी पावसाला सुमारे २४ दिवसांचा उशीर झाल्याने जिल्ह्यातील १९८ गावांना जवळपास अतिरिक्त २७ दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. तर भातलागवड एक ते दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.उन्हाळ्यात २०० गावांना ३७ टँकरने पाणीपुरवठा करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पावसाने ओढ घेतली असती तर, टंचाईदेखील वाढत गेली. मात्र, मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन फेबु्रवारीत १४ टक्के पाणीकपात महापालिकांना लावण्यात आली होती. ती आजतागायत आहे. १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण न वाढल्यास त्यानंतर मात्र जास्त पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. एक कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार ६२१ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर होत आहे. गावपाड्यांना दररोज ७.४६ दशलक्ष घनमीटर पाणी लागत आहे. २४ लघुपाटबंधारे आणि सहा केटी बंधाऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर ५० दशलक्ष घनमीटर पाणी जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वापरले जात आहे. तर ३०८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर या उद्योगधंद्यांमधील कामगारांसाठी केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजपर्यंत एक हजार १७७.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज भातसा धरणात २७.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय, मोडकसागरमध्ये ४५.०५ टक्के, आंध्रात २१.३० टक्के बारवी धरणात ११.६६ टक्के सूर्याच्या कवडास व धामणीमध्ये अनुक्रमे ९७.९९ व ४५.७७ टक्के आणि तानसामध्ये ९.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.२ जुलैपर्यंत सरासरी ९२० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. प्रारंभीच्या पावसात शेतकऱ्यांनी भातरोपांसाठी सुमारे ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असता उर्वरित ३० टक्के पेरण्यांचे काम संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाताची लागवड पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र या वर्षी खरिपाखाली येणार आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर भाताची लागवड आहे. नागली १५ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर तर वरी ११ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात घेतली जात आहे. उर्वरितक्षेत्रावर तूर, मूग, उडीद आणि तीळ, सोयाबीन आदी पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनवाढीसाठी ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर केला जाणार आहे. लांबलेल्या पावसावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भातपेरणीवर टँकरद्वारे पाणी फवारणी करून भाताची रोपे वाचवली आहेत.