शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सिग्नल नसल्याने वाहतूक कोंडी

By admin | Updated: September 19, 2016 01:34 IST

महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

हडपसर : सोलापूर रस्त्यावर महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या चौकातून महादेवनगर, मांजरीमार्गे वाघोलीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या चौकात सिग्नल बसवून सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पालिकेने सोलापूर रस्त्याचे लक्ष्मी कॉलनीपर्यंत रुंदीकरण करून स्ट्रीट लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. तरी मांजरी फाटा चौकात सिग्नल बसविण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांवर ढकलत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही रस्तारुंदीकरणासाठी परवानगी दिल्यानंतरच रुंदीकरण केले असेल ना, मग सिग्नल बसविण्यासाठी आडकाठी का घेतली जात आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.चौकातून जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे या चौकात सतत वाहतूककोंडी होत असते. गेल्या महिन्यापूर्वी दुपारी अडीचच्या सुमारास बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस टपरीमध्ये घुसली होती. अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. या चौकाच्या बाजूलाच भाजीविक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या गाड्याही लागलेल्या असतात. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी अपघातसदृश झाला आहे, असे नागरिकांनी सांगितले.अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज, खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीही याच चौकातून ये-जा करीत असतात. मांजरी-महादेवनगर परिसर महापालिकेलगत असल्याने नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. सोलापूर मार्गावरून आलेली अनेक वाहने मांजरीमार्गे वाघोलीकडे जात असतात. त्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा झाला आहे. मोठी वाहने या चौकातून मांजरीकडे वळाली की, पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होते आणि दूरपर्यंत रांगा लागतात. मांजरी फाटा चौकातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.(वार्ताहर)>हद्दीच्या वादात काम रखडलेया चौकात पीएमपीचा बसथांबा आहे. मात्र, बसशेड नसल्यामुळे अनेक विद्यार्थी रस्त्यावरच बसची वाट पाहत असतात. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे बसची वाट पाहणाऱ्यांना धोका होऊ शकतो. या चौकात गतिरोधक आणि सिग्नल तातडीने बसविण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, स्थानिक नागरिकचौकात सिग्नल बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेकडे वांरवार लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, हद्दीचा वाद दाखवून या ठिकाणी सिग्नल बसविला जात नाही. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- सुनील शेळके, सहायक पोलीस निरीक्षकअतिक्रमणामुळे चौकात रस्ता अरुंद झाला असून, सतत वाहतूककोंडी होत असते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- राजेश माने, स्थानिक नागरिक