शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

सिग्नल नसल्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 01:34 IST

महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

हडपसर : सोलापूर रस्त्यावर महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या चौकातून महादेवनगर, मांजरीमार्गे वाघोलीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या चौकात सिग्नल बसवून सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पालिकेने सोलापूर रस्त्याचे लक्ष्मी कॉलनीपर्यंत रुंदीकरण करून स्ट्रीट लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. तरी मांजरी फाटा चौकात सिग्नल बसविण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांवर ढकलत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही रस्तारुंदीकरणासाठी परवानगी दिल्यानंतरच रुंदीकरण केले असेल ना, मग सिग्नल बसविण्यासाठी आडकाठी का घेतली जात आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.चौकातून जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे या चौकात सतत वाहतूककोंडी होत असते. गेल्या महिन्यापूर्वी दुपारी अडीचच्या सुमारास बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस टपरीमध्ये घुसली होती. अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. या चौकाच्या बाजूलाच भाजीविक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या गाड्याही लागलेल्या असतात. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी अपघातसदृश झाला आहे, असे नागरिकांनी सांगितले.अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज, खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीही याच चौकातून ये-जा करीत असतात. मांजरी-महादेवनगर परिसर महापालिकेलगत असल्याने नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. सोलापूर मार्गावरून आलेली अनेक वाहने मांजरीमार्गे वाघोलीकडे जात असतात. त्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा झाला आहे. मोठी वाहने या चौकातून मांजरीकडे वळाली की, पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होते आणि दूरपर्यंत रांगा लागतात. मांजरी फाटा चौकातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.(वार्ताहर)>हद्दीच्या वादात काम रखडलेया चौकात पीएमपीचा बसथांबा आहे. मात्र, बसशेड नसल्यामुळे अनेक विद्यार्थी रस्त्यावरच बसची वाट पाहत असतात. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे बसची वाट पाहणाऱ्यांना धोका होऊ शकतो. या चौकात गतिरोधक आणि सिग्नल तातडीने बसविण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, स्थानिक नागरिकचौकात सिग्नल बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेकडे वांरवार लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, हद्दीचा वाद दाखवून या ठिकाणी सिग्नल बसविला जात नाही. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- सुनील शेळके, सहायक पोलीस निरीक्षकअतिक्रमणामुळे चौकात रस्ता अरुंद झाला असून, सतत वाहतूककोंडी होत असते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- राजेश माने, स्थानिक नागरिक