शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सिग्नल नसल्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 01:34 IST

महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

हडपसर : सोलापूर रस्त्यावर महादेवनगर चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या चौकातून महादेवनगर, मांजरीमार्गे वाघोलीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या चौकात सिग्नल बसवून सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पालिकेने सोलापूर रस्त्याचे लक्ष्मी कॉलनीपर्यंत रुंदीकरण करून स्ट्रीट लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. तरी मांजरी फाटा चौकात सिग्नल बसविण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांवर ढकलत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही रस्तारुंदीकरणासाठी परवानगी दिल्यानंतरच रुंदीकरण केले असेल ना, मग सिग्नल बसविण्यासाठी आडकाठी का घेतली जात आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.चौकातून जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे या चौकात सतत वाहतूककोंडी होत असते. गेल्या महिन्यापूर्वी दुपारी अडीचच्या सुमारास बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस टपरीमध्ये घुसली होती. अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. या चौकाच्या बाजूलाच भाजीविक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या गाड्याही लागलेल्या असतात. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी अपघातसदृश झाला आहे, असे नागरिकांनी सांगितले.अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज, खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीही याच चौकातून ये-जा करीत असतात. मांजरी-महादेवनगर परिसर महापालिकेलगत असल्याने नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. सोलापूर मार्गावरून आलेली अनेक वाहने मांजरीमार्गे वाघोलीकडे जात असतात. त्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा झाला आहे. मोठी वाहने या चौकातून मांजरीकडे वळाली की, पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होते आणि दूरपर्यंत रांगा लागतात. मांजरी फाटा चौकातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.(वार्ताहर)>हद्दीच्या वादात काम रखडलेया चौकात पीएमपीचा बसथांबा आहे. मात्र, बसशेड नसल्यामुळे अनेक विद्यार्थी रस्त्यावरच बसची वाट पाहत असतात. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे बसची वाट पाहणाऱ्यांना धोका होऊ शकतो. या चौकात गतिरोधक आणि सिग्नल तातडीने बसविण्याची गरज आहे.- प्रकाश पाटील, स्थानिक नागरिकचौकात सिग्नल बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेकडे वांरवार लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, हद्दीचा वाद दाखवून या ठिकाणी सिग्नल बसविला जात नाही. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- सुनील शेळके, सहायक पोलीस निरीक्षकअतिक्रमणामुळे चौकात रस्ता अरुंद झाला असून, सतत वाहतूककोंडी होत असते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- राजेश माने, स्थानिक नागरिक