शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वाढलेल्या तापमानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन घटले

By admin | Updated: March 25, 2017 02:22 IST

नवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने

जयंत धुळप / अलिबागनवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.खारेपाट भुवनेश्वर परिसरातून दरवर्षी दररोज सुमारे दोन हजार टन हापूस आंबा नवी मुंबई बाजारामध्ये जात होता. या वर्षी चांगला मोहोर आला. परंतु, फेब्रुवारीत अचानक वाढलेल्या तापमानामुळे तो गळून फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. दरवर्षीची परंपरा अबाधित राखून अलिबागच्या खारेपाटातील काही शेतकऱ्यांचा आंबा फेब्रुवारी महिन्यापासूनच नवी मुंबईच्या बाजारपेठेत जाऊ लागला आहे. परंतु, शेवटच्या मोहोराला फळ कमी झाल्यामुळे मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार, अशी शक्यता आंबा बागायतदार डॉ. पाटील व मारुती मास्तर यांनी व्यक्त केली. शासनाने आंबा बागायतदार व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. कारण, हमी भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांना उत्पादित माल रस्त्यावर टाकण्याची वेळ येते. त्यामुळेच शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मारुती मास्तर यांनी केली.