शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

वाढलेल्या तापमानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन घटले

By admin | Updated: March 25, 2017 02:22 IST

नवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने

जयंत धुळप / अलिबागनवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.खारेपाट भुवनेश्वर परिसरातून दरवर्षी दररोज सुमारे दोन हजार टन हापूस आंबा नवी मुंबई बाजारामध्ये जात होता. या वर्षी चांगला मोहोर आला. परंतु, फेब्रुवारीत अचानक वाढलेल्या तापमानामुळे तो गळून फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. दरवर्षीची परंपरा अबाधित राखून अलिबागच्या खारेपाटातील काही शेतकऱ्यांचा आंबा फेब्रुवारी महिन्यापासूनच नवी मुंबईच्या बाजारपेठेत जाऊ लागला आहे. परंतु, शेवटच्या मोहोराला फळ कमी झाल्यामुळे मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार, अशी शक्यता आंबा बागायतदार डॉ. पाटील व मारुती मास्तर यांनी व्यक्त केली. शासनाने आंबा बागायतदार व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. कारण, हमी भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांना उत्पादित माल रस्त्यावर टाकण्याची वेळ येते. त्यामुळेच शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मारुती मास्तर यांनी केली.