शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

गडकरींच्या ताकीदमुळे जिल्ह्यातील चार जलमार्गांचा अखरे मार्ग सुकर

By सुरेश लोखंडे | Updated: January 12, 2018 20:14 IST

यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

लोकमत इंम्पॅक्ट !सुरेश लोखंडेठाणे : जलमार्गांचा विकास करण्याची ताकीद देऊन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख चार जलमार्गांसह ठिकठिकाणच्या जलवाहतुकीचा मार्ग सुकर केला आहे. यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांनी दिलेल्या ताकीदमुळे जिल्हा यंत्रणा कामाला लागली आहे.राष्ट्रीय महामार्गांसह राज्य व मुख्य जिल्हामार्गांसह लोहमार्गांतील सततच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसह ठाणेकर रोज मरणयातना भोगत आहेत. त्यात ध्वनी व वायुप्रदूषणामुळे दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले आहे. या-ना-त्या कारणांमुळे होणारी सततची वाहतूककोंडी आणि प्रदूषणातून मुक्तता करणारे ठाणे जिल्ह्यातील जलमार्ग गांभीर्याने मार्गी लावणे लोकहिताचे असल्याचे लोकमतने प्रशासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून दिले आहेत. यामुळे लोहमार्गांवरील ताण कमी करणे शक्य होणार असून राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच ६३८ किमीच्या राज्यमार्ग व मुख्य जिल्हामार्गांवरील कोंडीदेखील जलमार्गामुळे कमी करणे शक्य होणार आहे. यासाठी प्रस्तावित सुमारे तीन हजार २५३ कोंटी खर्चाचे जलमार्ग मार्गी लावणे गरजेचे आहे.सर्वच महानगरांना लागलेले स्मार्ट सिटीचे वेध यामुळे जिल्ह्यातील महापालिकांकडे देशभरातील महानगरांच्या दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसह नवी मुंबई महापालिका-एमएमआरडीए भलेमोठे दोन हजार ८०० कोटींचे दोन ब्रॉड जलमार्ग यातील पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानचा १२ किमी लांबीच्या जलमार्गास, त्यासाठी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, वाशीगाव येथून खाडीकिनाºयावरून कोपरखैरणे-घणसोली-गोठिवली-रबाळे-ऐरोली व दिघा हा जलमार्ग उपनगरांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. वाशी ते ऐरोली व वाशी ते बेलापूरदरम्यानचा मार्गही त्वरित हाती घेण्याची गरज आहे.ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी खर्च होणार आहेत. यामध्ये इंद्रासिटी रूट ते घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत, दिवा हा जलमार्ग आहे. याशिवाय, ठाणे ते वसई, मीरा-भार्इंदर जलमार्ग, ठाणे ते भिवंडी, ठाणे ते डोंबिवली, कल्याण आदी चार जलमार्ग ठाणे मनपाने गांभीर्याने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार