शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

धुक्यामुळे नवी मुंबईकरांचा दम निघाला , खोकला वाढला, श्वसनाच्या आजारांचा धोका वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:47 IST

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे. या विचित्र वातावरणामुळे नवी मुंबईकरांचा दम निघाला आहे. ज्यांना श्वसनविकार आहे, अशा रु ग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, तर मुलांमध्ये रात्री खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.हवामानातील उष्मा, दमटपणा वाढतो, असे वातावरण खोकल्याच्या व घशाच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या आजारांसाठी पोषक असते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याने धूळही मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे. त्यामुळे संसर्गामुळे खोकला होण्याचे प्रमाण वाढेल असे श्वसनविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले. औद्योगिक वसाहतीमुळे जल व वायुप्रदूषण, वाढत्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी व त्याचा आरोग्यावर होणारा जीवघेणा परिणाम ही जागतिक पातळीवरची गंभीर समस्या बनली आहे. दिवाळीत झालेल्या वायू व ध्वनिप्रदूषणाने तब्येत बिघडलेल्या नवी मुंबईकरांवर या वातावरणाचा अजून गंभीर परिणाम होणार असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.खारघर परिसराच्या जवळच तळोजा औद्योगिक वसाहत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा आहे. त्यामुळे येथे प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. वारंवार तक्र ारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.धुळीचे प्रमाण ५६.२५%वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या वायुप्रदूषणाच्या अहवालानुसार सद्य:स्थितीत नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, ६८.९४ टक्के नोंदविण्यात आली आहे. धूलिकणाचे प्रमाण सर्वाधिक असून श्वसनविकाराला कारणीभूत ठरणारे आहे. शहरात धुळीचे प्रमाण ५६.२५ इतके आहे, तर शुद्ध हवेचे प्रमाण केवळ ३१ टक्के इतके आहे.बदल शरीराला बाधकगेल्या संपूर्ण महिन्यात दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक गार वारे असा विचित्र बदल शरीराला बाधक ठरत आहे व या बदलामुळे दमा, सुका खोकला आणि रक्तदाब असे विकार नागरिकांमध्ये बळावले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ओखी’ वादळामुळे गेले दोन दिवस नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडला आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे मलेरिया, डेंग्यूतही वाढ होणार आहे.लक्षणे : श्वसनास अडथळा निर्माण होणे, डोळे चुरचुरणे, खाज येणे, घसा बसणे, नाकातून पाणी येणेहे करा : घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या, डोक्यावर टोपी घाला, रुमालाने चेहरा झाका, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स घाला, योग्य आहार व व्यायाम महत्त्वाचा

टॅग्स :pollutionप्रदूषणNavi Mumbaiनवी मुंबई