शहरं
Join us  
Trending Stories
1
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
2
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
3
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
4
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
5
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
6
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
7
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
8
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
9
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
10
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
11
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
12
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
13
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
14
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
15
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
16
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
17
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
18
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
19
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
20
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा : शिक्षण असूनही नशिबी हमालीच...

By admin | Updated: March 13, 2016 01:56 IST

वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा

पुणे : वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा... या स्थितीतून आपल्याला शिक्षणच बाहेर काढेल हा विश्वास असल्याने दहावी आणि बारावी शिकवली... पण आता सततच्या दुष्काळाने नापिकी आल्याने शेतीत काहीच पिकत नाही. त्यामुळे शिक्षण सोडून शेतीत लक्ष घालण्यास सुरूवात केली. मात्र, गेल्या दोन वर्षात पुन्हा पावसाने पाठ फिरविली....त्यापेक्षा यंदाचा दृष्काळ घरच्यांनी सांगितलेल्या कथांपेक्षाही भयानक... त्यामुळे गेल्या दिड महिन्यापासून घरदार सोडून पुण्यात आलोय.. आता हमाली करतोय.. हा अनुभव आहे.. लातूर जिह्यातून कामासाठी पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये कामाच्या शोधात आलेल्या तरूणांच्या सुमारे ६० ते ७० तरूण दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने आले असून नशिबाच्या रेषांवर मात करण्यासाठी सरस्वतीचे हे उपासकांवर लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हमाली करण्याची वेळ आली आहे. मात्र, मनात काळजी आणि डोळयात लाज लपवून हे दिवसही निघून जातील या भावनेने हे तरूण दिवस काढत आहेत. दुष्काळामुळे अनेक कुटुंबे पुण्यात स्थलांतरीत झाली आहेत. घरी चार एकर जमीन आहे.. पण जिथं प्यायला पाणीच नाही तिथं शेती कुठून करणार... आसपासच्या जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती... आपल्या नशिबी हाच पाचविला पुजलेला दुष्काळ म्हणून पोटासाठी घरी वृद्ध आई-वडील सोडून याच्या-त्याच्या ओळखीतून पुण्यात आलो... पण इथंही दुष्काळाच्या साडेसातीने साथ सोडलेली नाही. पत्नी आणि मुलांसह गेल्या महिनाभरापासून पुण्यात राहात असलेला नांदेड जिल्ह्यातील भोकर या गावामधून आलेला सुभाष जाधव सांगत होता. घरी चार एकर शेती आहे. मात्र, पाणीच नाही त्यामुळे कामही नाही. घर चालविण्यासाठी पैशाची भ्रांत असल्याने पत्नी आणि मुलांसह पुण्यात आलो. तिथं शेतीत राबून इथल्या लोकांची पोटं भरविण्यासाठी पिकविणारा मी इथं मात्र बिगारी काम करत असल्याचे सांगताना त्याला शब्द जड झाले होते. घरी सहा एकर शेती.. घरात आई-वडील आणि आम्ही दोघे भाऊ. काही वर्षांपर्यंत पाऊसपाणी बरे असल्याने शेतात पिकं घेता येत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत पावसाअभावी काहीच पिकंल नाही. आता कामही मिळेना म्हणून पुणे गाठंल. बारावीपर्यंत शिक्षण झाल्याने काहीतरी काम मिळेल म्हणून आलो. आता मार्केट यार्डात हमाली करत असल्याचे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथून आलेला रामराव ठोंबरे सांगत होता. महादेव ठोंबरे याचीही अशीच अवस्था आहे.लातूर जिल्ह्यातील औसामधून रणवीर सोपटे हा दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला. घरी जेमतेम शेती असल्याने १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला रणवीरही मार्केटयार्डात मित्रांसह हमालीच करतो. घरी आई-वडील आणि बहीण आहे. या वर्षी बहिणीचं लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून घराबाहेर असलेल्या सोमनाथने काहीतरी हातभार लावावा अशी घरच्यांची इच्छा आहे. मात्र, या वर्षभरात कधी काम मिळाले तर कधी उपाशी राहायची वेळही आली. त्यामुळे पैसे शिल्लक राहत नाहीत. घरी जायचं तर मोठा खर्च होणार, म्हणून तो घरीही गेलेला नाही.