शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

दुष्काळाच्या झळा : शिक्षण असूनही नशिबी हमालीच...

By admin | Updated: March 13, 2016 01:56 IST

वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा

पुणे : वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा... या स्थितीतून आपल्याला शिक्षणच बाहेर काढेल हा विश्वास असल्याने दहावी आणि बारावी शिकवली... पण आता सततच्या दुष्काळाने नापिकी आल्याने शेतीत काहीच पिकत नाही. त्यामुळे शिक्षण सोडून शेतीत लक्ष घालण्यास सुरूवात केली. मात्र, गेल्या दोन वर्षात पुन्हा पावसाने पाठ फिरविली....त्यापेक्षा यंदाचा दृष्काळ घरच्यांनी सांगितलेल्या कथांपेक्षाही भयानक... त्यामुळे गेल्या दिड महिन्यापासून घरदार सोडून पुण्यात आलोय.. आता हमाली करतोय.. हा अनुभव आहे.. लातूर जिह्यातून कामासाठी पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये कामाच्या शोधात आलेल्या तरूणांच्या सुमारे ६० ते ७० तरूण दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने आले असून नशिबाच्या रेषांवर मात करण्यासाठी सरस्वतीचे हे उपासकांवर लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हमाली करण्याची वेळ आली आहे. मात्र, मनात काळजी आणि डोळयात लाज लपवून हे दिवसही निघून जातील या भावनेने हे तरूण दिवस काढत आहेत. दुष्काळामुळे अनेक कुटुंबे पुण्यात स्थलांतरीत झाली आहेत. घरी चार एकर जमीन आहे.. पण जिथं प्यायला पाणीच नाही तिथं शेती कुठून करणार... आसपासच्या जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती... आपल्या नशिबी हाच पाचविला पुजलेला दुष्काळ म्हणून पोटासाठी घरी वृद्ध आई-वडील सोडून याच्या-त्याच्या ओळखीतून पुण्यात आलो... पण इथंही दुष्काळाच्या साडेसातीने साथ सोडलेली नाही. पत्नी आणि मुलांसह गेल्या महिनाभरापासून पुण्यात राहात असलेला नांदेड जिल्ह्यातील भोकर या गावामधून आलेला सुभाष जाधव सांगत होता. घरी चार एकर शेती आहे. मात्र, पाणीच नाही त्यामुळे कामही नाही. घर चालविण्यासाठी पैशाची भ्रांत असल्याने पत्नी आणि मुलांसह पुण्यात आलो. तिथं शेतीत राबून इथल्या लोकांची पोटं भरविण्यासाठी पिकविणारा मी इथं मात्र बिगारी काम करत असल्याचे सांगताना त्याला शब्द जड झाले होते. घरी सहा एकर शेती.. घरात आई-वडील आणि आम्ही दोघे भाऊ. काही वर्षांपर्यंत पाऊसपाणी बरे असल्याने शेतात पिकं घेता येत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत पावसाअभावी काहीच पिकंल नाही. आता कामही मिळेना म्हणून पुणे गाठंल. बारावीपर्यंत शिक्षण झाल्याने काहीतरी काम मिळेल म्हणून आलो. आता मार्केट यार्डात हमाली करत असल्याचे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथून आलेला रामराव ठोंबरे सांगत होता. महादेव ठोंबरे याचीही अशीच अवस्था आहे.लातूर जिल्ह्यातील औसामधून रणवीर सोपटे हा दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला. घरी जेमतेम शेती असल्याने १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला रणवीरही मार्केटयार्डात मित्रांसह हमालीच करतो. घरी आई-वडील आणि बहीण आहे. या वर्षी बहिणीचं लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून घराबाहेर असलेल्या सोमनाथने काहीतरी हातभार लावावा अशी घरच्यांची इच्छा आहे. मात्र, या वर्षभरात कधी काम मिळाले तर कधी उपाशी राहायची वेळही आली. त्यामुळे पैसे शिल्लक राहत नाहीत. घरी जायचं तर मोठा खर्च होणार, म्हणून तो घरीही गेलेला नाही.