शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

दुष्काळाच्या झळा : शिक्षण असूनही नशिबी हमालीच...

By admin | Updated: March 13, 2016 01:56 IST

वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा

पुणे : वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा... या स्थितीतून आपल्याला शिक्षणच बाहेर काढेल हा विश्वास असल्याने दहावी आणि बारावी शिकवली... पण आता सततच्या दुष्काळाने नापिकी आल्याने शेतीत काहीच पिकत नाही. त्यामुळे शिक्षण सोडून शेतीत लक्ष घालण्यास सुरूवात केली. मात्र, गेल्या दोन वर्षात पुन्हा पावसाने पाठ फिरविली....त्यापेक्षा यंदाचा दृष्काळ घरच्यांनी सांगितलेल्या कथांपेक्षाही भयानक... त्यामुळे गेल्या दिड महिन्यापासून घरदार सोडून पुण्यात आलोय.. आता हमाली करतोय.. हा अनुभव आहे.. लातूर जिह्यातून कामासाठी पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये कामाच्या शोधात आलेल्या तरूणांच्या सुमारे ६० ते ७० तरूण दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने आले असून नशिबाच्या रेषांवर मात करण्यासाठी सरस्वतीचे हे उपासकांवर लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हमाली करण्याची वेळ आली आहे. मात्र, मनात काळजी आणि डोळयात लाज लपवून हे दिवसही निघून जातील या भावनेने हे तरूण दिवस काढत आहेत. दुष्काळामुळे अनेक कुटुंबे पुण्यात स्थलांतरीत झाली आहेत. घरी चार एकर जमीन आहे.. पण जिथं प्यायला पाणीच नाही तिथं शेती कुठून करणार... आसपासच्या जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती... आपल्या नशिबी हाच पाचविला पुजलेला दुष्काळ म्हणून पोटासाठी घरी वृद्ध आई-वडील सोडून याच्या-त्याच्या ओळखीतून पुण्यात आलो... पण इथंही दुष्काळाच्या साडेसातीने साथ सोडलेली नाही. पत्नी आणि मुलांसह गेल्या महिनाभरापासून पुण्यात राहात असलेला नांदेड जिल्ह्यातील भोकर या गावामधून आलेला सुभाष जाधव सांगत होता. घरी चार एकर शेती आहे. मात्र, पाणीच नाही त्यामुळे कामही नाही. घर चालविण्यासाठी पैशाची भ्रांत असल्याने पत्नी आणि मुलांसह पुण्यात आलो. तिथं शेतीत राबून इथल्या लोकांची पोटं भरविण्यासाठी पिकविणारा मी इथं मात्र बिगारी काम करत असल्याचे सांगताना त्याला शब्द जड झाले होते. घरी सहा एकर शेती.. घरात आई-वडील आणि आम्ही दोघे भाऊ. काही वर्षांपर्यंत पाऊसपाणी बरे असल्याने शेतात पिकं घेता येत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत पावसाअभावी काहीच पिकंल नाही. आता कामही मिळेना म्हणून पुणे गाठंल. बारावीपर्यंत शिक्षण झाल्याने काहीतरी काम मिळेल म्हणून आलो. आता मार्केट यार्डात हमाली करत असल्याचे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथून आलेला रामराव ठोंबरे सांगत होता. महादेव ठोंबरे याचीही अशीच अवस्था आहे.लातूर जिल्ह्यातील औसामधून रणवीर सोपटे हा दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला. घरी जेमतेम शेती असल्याने १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला रणवीरही मार्केटयार्डात मित्रांसह हमालीच करतो. घरी आई-वडील आणि बहीण आहे. या वर्षी बहिणीचं लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून घराबाहेर असलेल्या सोमनाथने काहीतरी हातभार लावावा अशी घरच्यांची इच्छा आहे. मात्र, या वर्षभरात कधी काम मिळाले तर कधी उपाशी राहायची वेळही आली. त्यामुळे पैसे शिल्लक राहत नाहीत. घरी जायचं तर मोठा खर्च होणार, म्हणून तो घरीही गेलेला नाही.