शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

By नामदेव कुंभार | Updated: October 17, 2017 18:10 IST

मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते..

मुंबई -  मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते. राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम आहे. अशात एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे जनतेचे हाल सुरु आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपानंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारलेय. विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे महामंडळाला दिवसांला 20 कोटींचं नुकसान होणार आहे. 

दिवाळीमध्ये एसटीला तुडुंब प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिवळातील कमाईही जास्त असते पण मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाला 20 कोटीं किंवा त्यापेक्षा आधिकचा तोटा होणार असल्याची माहिती लोकमतला एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी दिली. ते म्हणाले, की हा संप कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संपामध्ये भाग घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण काय कारवाई केली जाईल यावर बोलताना त्यांनी मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या हा संप  किती दिवसांमध्ये संपवण्यात प्रशासनाला यश येतं हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे. 

या संपामध्ये राज्यातील 1 लाख 7 हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे तब्बल 17 हजार गाड्यांना ब्रेक लागला आहे. 258 बस आगार आणि 31 विभागिय कार्यलयांमध्ये सामसुम आहे.  याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाची हाक दिली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र ही चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप झालाय. त्यामुळे राज्यातील जनतेचे मोठे हाल सुरु आहेत. 

परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी मुखमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी. 

टॅग्स :StrikeसंपST Strikeएसटी संप