शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

By नामदेव कुंभार | Updated: October 17, 2017 18:10 IST

मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते..

मुंबई -  मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते. राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम आहे. अशात एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे जनतेचे हाल सुरु आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपानंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारलेय. विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे महामंडळाला दिवसांला 20 कोटींचं नुकसान होणार आहे. 

दिवाळीमध्ये एसटीला तुडुंब प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिवळातील कमाईही जास्त असते पण मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाला 20 कोटीं किंवा त्यापेक्षा आधिकचा तोटा होणार असल्याची माहिती लोकमतला एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी दिली. ते म्हणाले, की हा संप कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संपामध्ये भाग घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण काय कारवाई केली जाईल यावर बोलताना त्यांनी मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या हा संप  किती दिवसांमध्ये संपवण्यात प्रशासनाला यश येतं हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे. 

या संपामध्ये राज्यातील 1 लाख 7 हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे तब्बल 17 हजार गाड्यांना ब्रेक लागला आहे. 258 बस आगार आणि 31 विभागिय कार्यलयांमध्ये सामसुम आहे.  याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाची हाक दिली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र ही चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप झालाय. त्यामुळे राज्यातील जनतेचे मोठे हाल सुरु आहेत. 

परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी मुखमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी. 

टॅग्स :StrikeसंपST Strikeएसटी संप