शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

By नामदेव कुंभार | Updated: October 17, 2017 18:10 IST

मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते..

मुंबई -  मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते. राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम आहे. अशात एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे जनतेचे हाल सुरु आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपानंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारलेय. विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे महामंडळाला दिवसांला 20 कोटींचं नुकसान होणार आहे. 

दिवाळीमध्ये एसटीला तुडुंब प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिवळातील कमाईही जास्त असते पण मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाला 20 कोटीं किंवा त्यापेक्षा आधिकचा तोटा होणार असल्याची माहिती लोकमतला एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी दिली. ते म्हणाले, की हा संप कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संपामध्ये भाग घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण काय कारवाई केली जाईल यावर बोलताना त्यांनी मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या हा संप  किती दिवसांमध्ये संपवण्यात प्रशासनाला यश येतं हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे. 

या संपामध्ये राज्यातील 1 लाख 7 हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे तब्बल 17 हजार गाड्यांना ब्रेक लागला आहे. 258 बस आगार आणि 31 विभागिय कार्यलयांमध्ये सामसुम आहे.  याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाची हाक दिली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र ही चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप झालाय. त्यामुळे राज्यातील जनतेचे मोठे हाल सुरु आहेत. 

परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी मुखमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी. 

टॅग्स :StrikeसंपST Strikeएसटी संप