शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पिके सुकल्याने शेतक-याने मागितली इच्छा मरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 15:21 IST

पावसाने महिन्याभरापासून दडी मारल्याने पिके सुकत असून शेतकरी पिके वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत.

 
नाना देवळे, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर, दि. १० -  तालुक्यातील मोहगव्हाण येथील शेत शिवारातील रोहित्र दीड महिन्यांपूर्वी बंद पडले. त्यातच पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे खरीपातील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके सुकत आहेत. अशात पाण्याची सोय असतानाही शेतकरी पिके वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यासाठी विज वितरणकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे मोहगव्हाण येथील शेतकरी केशवराव भगत यांनी इच्छा मरणाची परवानगीच निवेदनाद्वारे मागितली आहे.
 
मागील तीन वर्षांतील अवर्षणानंतर यंदा प्रथमच पावसाने सुरुवातीचे दोन महिने चांगली साथ दिली. त्यामुळे शेतकºयांना उडीद, मूग या पिकांचे बºयापैकी उत्पादन झाले. तथापि, तालुक्यात यंदाही सोयाबीन आणि तूर या पिकांचाच पेरा अधिक आहे. सुरुवातीला चांगली साथ देणाºया पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे ही पिके सुकत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी वाढली, जलाशये भरली. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाचा आधार घेऊन ही पिके वाचविणे शक्य होऊ शकते; परंतु शेतकºयांच्या या प्रयत्नानांही विज वितरणची हलगर्जी खोडा घालत आहे. मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी आवश्यक वेळी विज पुरवठा होत नाहीच शिवाय कृषी फिडरची काही ठिकाणची रोहित्र जळून बंद पडल्याने शेतकरी सुकत चाललेल्या पिकांकडे डोळाभर पाहून आसू गाळण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. अशीच परिस्थिती मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे रोहित्र दीड महिन्यापूर्वी बंद पडल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यात असमर्थ ठरत आहेत. विज वितरणकडे वारंवार मागणी करूनही सदर रोहीत्र बदलण्याची तसदी घेण्यात येत नाही. त्यामुळे येथील प्रगतशील शेतकरी केशवराव भगत यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून इच्छा मरणाची परवानगीच मागितली आहे. या निवेदनावर राजू इंगोले, पंडित इंगोले, सिद्धार्थ इंगोले, शंकर धनकर आदि शेतकºयांच्याही स्वाक्षºया आहेत.