शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

दुष्काळाची केंद्रात धग

By admin | Updated: September 8, 2015 05:46 IST

महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ ५९ टक्के साठा शिल्लक असल्याच्या माहितीने केंद्राच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीचा १२ टक्के तुटीच्या मान्सूनचा अंदाज आता १८ टक्क्यांवर

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीमहाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ ५९ टक्के साठा शिल्लक असल्याच्या माहितीने केंद्राच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीचा १२ टक्के तुटीच्या मान्सूनचा अंदाज आता १८ टक्क्यांवर व मराठवाड्यातील तुटीच्या पावसाचे प्रमाण ४५ टक्क्यांच्या घरात गेल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भरच पडली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि देशाच्या अन्य भागात मान्सूनला परतीचे वेध लागल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविल्याने कृषी भवनात चिंतेचे मळभ आले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राला मदतीचे पॅकेज देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रासाठी मदतीच्या पॅकेजची घोषणा करण्यापूर्वी केंद्राला विस्तृत आराखडा हवा आहे. राज्य सरकारने जिल्हानिहाय अहवाल मिळण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये परतीचा पाऊस दिलासा देईल, अशी अजूनही आशा आहे. केंद्रीय जल आयोगाने सोमवारी महाराष्ट्र आणि गुजरातमधील २७ जलाशयांच्या स्थितीबाबत जारी केलेला तपशीलही चिंता वाढवणाराच आहे. या २७ जलाशयांमध्ये केवळ ४९ टक्के पाणी आहे. हे प्रमाण गेल्या १० वर्षांतील सरासरी साठवणूक क्षमतेच्या कितीतरी कमी आहे. सप्टेंबरच्या मध्यातच परतीची वाट धरणाऱ्या मान्सूनने अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या मोदी सरकारच्या आशेला तडा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राला लागोपाठ तीन वर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कृषी मंत्रालयाच्या चमूने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणाच्या दुष्काळग्रस्त भागाला भेट दिली. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज गृहित धरून सरकारने दुष्काळाचे आव्हान स्वीकारण्याची तयारी चालविली आहे. रेल्वे वाघिणीतून मराठवाड्यात पाणी नेण्याचा भगीरथ प्रयत्न करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. लातूर व परभणीसाठी विदर्भातील दोन धरणातून रेल्वेने पाणी नेण्याचा पर्यायही पुढे आला आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द व यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा ही धरणे शंभरटक्के भरली आहेत. हे दोन्ही प्रकल्प हावडा- मुंबई या एकाच रेल्वेमार्गावर आहेत. गोसीखुर्दपासून धरणापासून भंडारा रेल्वेस्थानक ५० किमी, नागपूर ६० तर नागभिड ४० किमी अंतरावर आहे. तसेच बेंबळा धरणापासून धामणगाव रेल्वे हे स्थानक २५ कि.मी अंतरावर आहे.वाहतूक केव्हा, किती प्रमाणात व कशी करायची याबाबत मुख्यमंत्री फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले. नियंत्रण,अंमलबजावणी तसेच समन्वयासाठी रेल्वे व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले जाणार आहे. उपसमितीचे अध्यक्षपदी मुनगंटीवार की खडसे?मराठवाड्यातील दुष्काळी भागातील लोकांना मदत देण्याकरिता सध्याचे निकष बदलण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्षपद वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे की महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुनगंटीवार यांची समिती याबाबत निर्णय घेईल, असे सांगितले तर महसूलमंत्री या नात्याने या उपसमितीचे आपण अध्यक्ष असल्याचा दावा खडसे यांनी केला. दुष्काळ जाहीर करा - सेनामराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५०%पेक्षा खाली आलेली असताना तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत केली.विद्यार्थ्यांची फी माफ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची बारावीपर्यंतची फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेच्या मुलांना फीमध्ये ५० टक्के सवलत मिळेल. १.३५ कोटी शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येणार. त्याचा हप्ता सरकार भरणार. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.मराठवाड्याच्या अर्जाला आव्हान : भंडारदरा, निळवंडे धरणातून मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात दाखल झालेल्या मागणी अर्जाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना व संजीवनी कारखान्याच्या वतीने जलसंपदा नियमन प्राधिकरणाकडे आव्हान देण्यात आले.महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला धीर देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या तारखेची निश्चिती येत्या आठवडाभरात होईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्लीत दिली.