शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धावण्याच्या अंतरात केली घट

By admin | Updated: January 13, 2016 01:28 IST

पोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी

- डिप्पी वांकाणी, मुंबईपोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी ३ कि.मी.वरून ८०० मीटर इतके अंतर कमी केले आहे. गेल्या वर्षी पोलीस भरतीच्या वेळी धावताना चार युवकांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत शासनाने गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी मात्र या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ११ व १४ जून रोजी राहुल सपकाळ, प्रसाद माळी, अंबादास सोनवणे व विशाल केदार हे चार युवक पोलीस भरतीच्या वेळी ५ कि.मी. धावण्याची चाचणी देत असताना मरण पावले होते. उच्च न्यायालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शासनाने धावण्याचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. चार युवकांच्या मृत्यूचे प्रकरण विधानसभेतही उपस्थित झाले होते व त्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी व गृहखात्याचे प्रतिनिधी यांना या प्रकरणाची तपशीलवार छाननी करण्यास सांगण्यात आले होते. या गटाने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने वरील निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस भरतीसाठी या आठवड्यात जाहिरात दिली जाणार असून प्रत्यक्ष भरती फेब्रुवारीत होईल. त्यांनी सांगितले की, अंतर कमी करण्याचा निर्णय माझ्या मतानुसार फार चांगला नाही. पोलीस दलात प्रत्यक्ष काम करताना जी क्षमता तरुण मुलांमध्ये असायला हवी त्यानुसार ५ कि.मी. अंतर फार नव्हते. काही वेळा तर पोलिसांना १४ तास बंदोबस्त करावा लागतो. अशा वेळी त्यांच्यात सहनशक्ती असावी लागते. एकाच वेळी लेखी परीक्षाएकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी परीक्षा देण्याचे टाळण्यासाठी आता पोलीस भरतीतील सर्व उमेदवारांची लेखी चाचणी राज्यभरात एकाचवेळी घेतली जाणार आहे. आतापर्यंत वेगवेगळया वेळी लेखी परीक्षा होत असे. त्यामुळे उमेदवार वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देऊन एक पर्याय निवडत असे. परिणामी बऱ्याच जागा रिकाम्या राहात.अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार पोलीस भरती हिवाळ्यात घेण्यात यावी असे सुचविण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मुंबईत लाखावर युवक भर तीसाठी येतात. भरती प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू झाली तरी मे अखेरपर्यंत ती चालणार. त्यामुळे हिवाळ्याची अट पाळली जाण्याची शक्यता कमी आहे.गेल्या वर्षी दुपारनंतर ही चाचणी घेतली गेली, त्यावेळी तापमानही खूप होते व आर्द्रताही जास्त होती. त्यावेळी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन चार युवक कोसळले. पण आता शारीरिक चाचणी एकतर सकाळी वा सायंकाळी ४.३० नंतर घेण्याचा निर्णय झालेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुरुंगातील सेवेसाठी पूर्वी स्वतंत्र पोलीस भरती होत होती. नव्या निर्णयानुसार आता स्वतंत्र न होता एकत्र प्रक्रियेतूनच तुरुंगासाठी पोलीस निवडले जातील.