शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

धावण्याच्या अंतरात केली घट

By admin | Updated: January 13, 2016 01:28 IST

पोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी

- डिप्पी वांकाणी, मुंबईपोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी ३ कि.मी.वरून ८०० मीटर इतके अंतर कमी केले आहे. गेल्या वर्षी पोलीस भरतीच्या वेळी धावताना चार युवकांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत शासनाने गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी मात्र या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ११ व १४ जून रोजी राहुल सपकाळ, प्रसाद माळी, अंबादास सोनवणे व विशाल केदार हे चार युवक पोलीस भरतीच्या वेळी ५ कि.मी. धावण्याची चाचणी देत असताना मरण पावले होते. उच्च न्यायालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शासनाने धावण्याचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. चार युवकांच्या मृत्यूचे प्रकरण विधानसभेतही उपस्थित झाले होते व त्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी व गृहखात्याचे प्रतिनिधी यांना या प्रकरणाची तपशीलवार छाननी करण्यास सांगण्यात आले होते. या गटाने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने वरील निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस भरतीसाठी या आठवड्यात जाहिरात दिली जाणार असून प्रत्यक्ष भरती फेब्रुवारीत होईल. त्यांनी सांगितले की, अंतर कमी करण्याचा निर्णय माझ्या मतानुसार फार चांगला नाही. पोलीस दलात प्रत्यक्ष काम करताना जी क्षमता तरुण मुलांमध्ये असायला हवी त्यानुसार ५ कि.मी. अंतर फार नव्हते. काही वेळा तर पोलिसांना १४ तास बंदोबस्त करावा लागतो. अशा वेळी त्यांच्यात सहनशक्ती असावी लागते. एकाच वेळी लेखी परीक्षाएकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी परीक्षा देण्याचे टाळण्यासाठी आता पोलीस भरतीतील सर्व उमेदवारांची लेखी चाचणी राज्यभरात एकाचवेळी घेतली जाणार आहे. आतापर्यंत वेगवेगळया वेळी लेखी परीक्षा होत असे. त्यामुळे उमेदवार वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देऊन एक पर्याय निवडत असे. परिणामी बऱ्याच जागा रिकाम्या राहात.अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार पोलीस भरती हिवाळ्यात घेण्यात यावी असे सुचविण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मुंबईत लाखावर युवक भर तीसाठी येतात. भरती प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू झाली तरी मे अखेरपर्यंत ती चालणार. त्यामुळे हिवाळ्याची अट पाळली जाण्याची शक्यता कमी आहे.गेल्या वर्षी दुपारनंतर ही चाचणी घेतली गेली, त्यावेळी तापमानही खूप होते व आर्द्रताही जास्त होती. त्यावेळी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन चार युवक कोसळले. पण आता शारीरिक चाचणी एकतर सकाळी वा सायंकाळी ४.३० नंतर घेण्याचा निर्णय झालेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुरुंगातील सेवेसाठी पूर्वी स्वतंत्र पोलीस भरती होत होती. नव्या निर्णयानुसार आता स्वतंत्र न होता एकत्र प्रक्रियेतूनच तुरुंगासाठी पोलीस निवडले जातील.