शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

आमसूलचे दर घसरल्याने आदिवासींच्या जीवनातील गोडवा हरपला

By admin | Updated: June 16, 2017 13:29 IST

पिढ्यांपिढ्यापासून सातपुड्यातील आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी मोठा आधार ठरलेल्या आमसूल व्यवसायाने यंदा आदिवासींच्या पदरी निराशाच आली आहे.

- रमाकांत पाटील / आॅनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 16 - पिढ्यांपिढ्यापासून सातपुड्यातील आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी मोठा आधार ठरलेल्या आमसूल व्यवसायाने यंदा आदिवासींच्या पदरी निराशाच आली आहे. निसर्गाच्या कृपेमुळे यंदा हंगाम चांगला झाला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत आमसूलला निम्मेच भाव मिळाल्याने आमसूलचा गोडवाच हरविल्याचे चित्र आहे.सातपुड्यात दोन लाखांहून अधिक गावरान आंब्यांची झाडे आहेत. याशिवाय आदिवासी उत्थान कार्यक्रम व इतर माध्यमातून तीन लाखांहून अधिक आंब्यांच्या झाडांची नवीन लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात आंब्याचे मोठे उत्पन्न येते. या भागात आदिवासींना कुठलाही रोजगार नसल्याने आंब्याच्या कैरीपासून येथील आदिवासी आमसूल बनवितात. दरवर्षी एप्रिल ते जून या भागातील आदिवासींचा मुक्काम आंब्याच्या झाडाखालीच असतो. अख्खे कुटुंब कैरीपासून आमसूल बनविण्याच्या कामात व्यस्त असते. आमसूलपासून मिळणारे उत्पन्न हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनते. यावर्षी आंब्याच्या हंगाम चांगला आला. ऐन बहराचा काळात वादळवारा नसल्याने मोहरही चांगला बहरला होता. परिणामी आंब्याचे उत्पन्नही चांगले आले. त्यामुळे आमसूलचे उत्पादनही वाढले. यावर्षी सातपुड्यात जवळपास पाच हजार क्विंटलहून अधिक आमसूल तयार करण्यात आले असून येथील आदिवासींनी तो स्थानिक व्यापाऱ्यांकडे विकला, परंतु सुरुवातीला अतिशय कमी म्हणाले जेमतेम ४० ते ६० रुपये प्रति किलो भाव मिळाला. पुढे काही प्रमाणात वाढून तो जास्तीत जास्त १२० रुपये किलोपर्यंत गेला. हा भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० टक्केंपर्यंतच होता. गेल्यावर्षी चांगल्या मालाला २५० ते ३०० रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला होता. पण यंदा भाव न मिळाल्याने उत्पन्न येवूनही आदिवासींच्या नशिबी निराशाच आली आहे. सातपुड्यातील जवळपास ३० हजारापेक्षा अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह आमसूल व्यवसायावर आहे. काही कुटुंब रोजगारासाठी बाहेर जात असल्याने अशा कुटुंबांकडून इतर लोक मोहर येण्याच्या काळात आंब्याची झाडे प्रती झाडाप्रमाणे हंगामासाठी भाडेतत्वावर घेत असतात. ज्या लोकांनी भाडेतत्वावर झाडे घेतली होती त्यांनी त्या काळची परिस्थिती पाहून झाड मालकांना चांगला भाव दिला. पण प्रत्यक्षात मात्र आमसूलचे दर नसल्याने त्यांनाही त्यात नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आदिवसींची आहे.यावर्षी आपण आपल्या स्वत:चे १२ आंब्याचे झाडे तसेच इतर भाडेतत्वार ४० झाडे घेतली होती. उत्पन्न चांगले असल्याने आपण बाहेर गावाची नोकरी सोडून आमसूल तयार करण्यासाठी आई-वडिलांच्या मदतीला आलो. पण भाव न मिळाल्याने अपेक्षित रक्कम मिळू शकली नाही. त्यामुळे दोन महिने राबून हातात फार काही शिल्लक नसल्याचे रामसिंग पाडवी यांनी सांगितले.