शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’मुळे दलित सत्तेपासून वंचित, रामदास आठवले यांची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:26 IST

‘वंचित आघाडी’मुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘वंचित’मुळे दलित सत्तेपासून वंचित, रामदास आठवले यांची भिती कॉँग्रेस, राष्ट्रवादीला भवितव्य नाही

कोल्हापूर : ‘वंचित आघाडी’मुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.लोक कॉँग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात दोन्ही कॉँग्रेसना भवितव्य नसल्याने शरद पवार यांनी ‘एनडीए’मध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आठवले यांनी सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा, रमाई योजना, दिव्यांगांना साहित्य वाटप, आंतरजातीय विवाह, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री सुरक्षा योजना या सर्व योजनांचा आढावा घेऊन त्यांची आकडेवारी सादर केली.प्रकाश आंबेडकर ईव्हीएम मशीनबाबत शंका घेत असल्याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, ही मशीन्सवरची मतदान पद्धत कॉँग्रेसनेच सुरू केली. एखाद-दुसरे मशीन बाद झाले याचा अर्थ सर्व यंत्रणा चुकीची आहे असे नाही. त्यातूनही काहींना शंका असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी.‘वंचित आघाडी’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी असल्याचा आरोप करून आठवले म्हणाले, काही ठिकाणी उमेदवाराचीच ताकद जास्त असल्याने त्यांनी मते खाल्ली. त्यामध्ये ‘वंचित’च्या प्रभावाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी आता ‘एनडीए’सोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही.

विधानसभेला १८ पैकी १० जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात, विस्तारावेळी मंत्रिपद मिळावे, ५० कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान मिळावे, या आपल्या मागण्या आहेत.यावेळी प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीमित्रपक्षांना भाजप कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह करीत असल्याबाबत विचारल्यानंतर, ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही,’ असे आठवले यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळीही आम्ही आमच्या चिन्हावर लढलो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली.आंतरजातीय विवाह वाढण्याची गरजजातिअंतासाठी रोटीबेटीचे व्यवहार वाढले पाहिजेत, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती; परंतु आज वर्षाला देशभरामध्ये केवळ ६० हजारांहून अधिक आंतरजातीय विवाह होत असल्याची आकडेवारी आहे. मात्र ती कमी आहे. विविध योजनांसाठी अर्ज केल्यानंतर हा आकडा मिळाला आहे. मात्र याहीपेक्षा आकडा जास्त असून संबंधित नोंदणी केलेल्या न्यायालयांकडून आकडे घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, आंतरजातीय विवाह वाढण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले.४३ हजारांहून अधिक अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हेदेशभरातून ४३ ते ४७ हजार इतके अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत असून यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान हे आघाडीवर असल्याचे आठवले यांनी सांगितले.७६ हजार कोटींचा निधीआठवले म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचा वार्षिक निधी ७६ हजार कोटी रुपयांचा असून तो केंद्र शासनाच्या २० विभागांना वितरित करण्यात येतो. त्यातून वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkolhapurकोल्हापूर