शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

कर्जमाफीवरून कोंडी

By admin | Updated: March 14, 2017 07:45 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिला आहे. महापालिका निवडणुकीत वरचढ ठरलेल्या भाजपाची कोंडी करण्याचाच हा प्रकार असून सत्ताधारी युतीत आता कुरघोडीचे राजकारण वेग घेण्याची चिन्हे आहेत. तसेच शिवसेनेच्या या भूमिकेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरणार हे स्पष्ट झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नाही. धुळवड आणि तुकाराम बीजनिमित्त सोमवारी आणि मंगळवारी कामकाजाला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावरून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपाची कोंडी केली. उत्तर प्रदेशात कर्जमुक्तीचे आश्वासन देता मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहे, असा सवाल शिवसेनेने केला. मात्र, शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आहे असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना आमदारांनी पहिल्या आठवड्यात स्वतंत्रपणे आंदोलन केले होते. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत असताना शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले होते. आता, आदेश दिल्याने शिवसेना आमदारांचा मार्ग मोकळा झाला आहे. कामकाज चालविण्याचे भाजपापुढे मोठे आव्हानसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. परंतु कर्जमाफीमुळे फक्त बँकांचे फावते. सरकारला कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी आहे, अशी भूमिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. त्यासाठी शेतीच्या शाश्वत विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी केला होता. मात्र, कर्जमाफीशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याने पहिल्या आठवड्याचे कामकाज होऊ शकले नव्हते. दुसऱ्या आठवड्यात हीच परिस्थिती कायम राहील.उलट, कर्जमाफीवरून शिवसेना उघडपणे मैदानात उतरल्याने विरोधकांची बाजू वरचढ ठरणार आहे. शनिवारी अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने त्यापूर्वी आवश्यक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर असणार आहे. आदेशानुसार काम रोखणार‘कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबाराचा उतारा कोरा झाला पाहिजे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही केली होती. त्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे स्पष्ट आदेशच सर्व आमदारांना पक्षप्रमुखांनी दिले आहेत, अशी माहिती शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत खेडमध्ये दिली. शिवसेनेकडून होणाऱ्या या कोंडीतून आता भाजपा कसा मार्ग काढणार याची उत्सुकता असणार आहे.