शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

कर्जमाफीवरून कोंडी

By admin | Updated: March 14, 2017 07:45 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिला आहे. महापालिका निवडणुकीत वरचढ ठरलेल्या भाजपाची कोंडी करण्याचाच हा प्रकार असून सत्ताधारी युतीत आता कुरघोडीचे राजकारण वेग घेण्याची चिन्हे आहेत. तसेच शिवसेनेच्या या भूमिकेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरणार हे स्पष्ट झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नाही. धुळवड आणि तुकाराम बीजनिमित्त सोमवारी आणि मंगळवारी कामकाजाला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावरून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपाची कोंडी केली. उत्तर प्रदेशात कर्जमुक्तीचे आश्वासन देता मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहे, असा सवाल शिवसेनेने केला. मात्र, शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आहे असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना आमदारांनी पहिल्या आठवड्यात स्वतंत्रपणे आंदोलन केले होते. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत असताना शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले होते. आता, आदेश दिल्याने शिवसेना आमदारांचा मार्ग मोकळा झाला आहे. कामकाज चालविण्याचे भाजपापुढे मोठे आव्हानसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. परंतु कर्जमाफीमुळे फक्त बँकांचे फावते. सरकारला कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी आहे, अशी भूमिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. त्यासाठी शेतीच्या शाश्वत विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी केला होता. मात्र, कर्जमाफीशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याने पहिल्या आठवड्याचे कामकाज होऊ शकले नव्हते. दुसऱ्या आठवड्यात हीच परिस्थिती कायम राहील.उलट, कर्जमाफीवरून शिवसेना उघडपणे मैदानात उतरल्याने विरोधकांची बाजू वरचढ ठरणार आहे. शनिवारी अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने त्यापूर्वी आवश्यक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर असणार आहे. आदेशानुसार काम रोखणार‘कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबाराचा उतारा कोरा झाला पाहिजे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही केली होती. त्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे स्पष्ट आदेशच सर्व आमदारांना पक्षप्रमुखांनी दिले आहेत, अशी माहिती शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत खेडमध्ये दिली. शिवसेनेकडून होणाऱ्या या कोंडीतून आता भाजपा कसा मार्ग काढणार याची उत्सुकता असणार आहे.