शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

जलवाहिनी फुटून दोघांचा मृत्यू

By admin | Published: July 08, 2017 4:43 AM

वांद्रे येथील बेहराम पाड्यातील ७२ इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. या जलवाहिनीच्या वाहणाऱ्या पाण्याने दोन सख्ख्या भावंडांचे

मुंबई : वांद्रे येथील बेहराम पाड्यातील ७२ इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. या जलवाहिनीच्या वाहणाऱ्या पाण्याने दोन सख्ख्या भावंडांचे प्राण घेतले. या घटनेनंतर परिसरात काही वेळासाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घरांमध्ये पाणी शिरल्याने जवळपास पन्नास कुटुंबे बेघर झाली आहेत.या घटनेनंतर जलवाहिनीलगतच्या दोन्ही बाजूंकडील झोपड्यांवर आॅक्टोबर महिन्यात कारवाई केली जाईल आणि जलवाहिन्या संरक्षित केल्या जातील, असे एच/ईस्टच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बेहरामपाड्यामध्ये इंदिरानगर जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे स्थानिकांनी घराबाहेर पडून नेमका प्रकार काय, हे पाहण्याआधीच पाण्याचा मोठा लोट त्यांच्या घरात शिरला. या ठिकाणी असलेल्या ७२ इंच व्यासाच्या जलवाहिनीचे झाकण उडाले आणि मधोमध ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या जलवाहिनीतून बाहेर येऊ लागले. नेमक्या काही अंतरावर असलेल्या झोपडीत प्रियांका डोईफोडे (९) ही मुलगी तिच्या आठ महिन्यांच्या भावाला खेळवत होती. हे दोघे अतिवेगवान पाण्यात वाहून गेले. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. प्रियांकाला व्ही.एन. देसाई तर स्वप्निलला भाभा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारचा दिवस असल्याने मुस्लीम बांधवांचा नमाज या ठिकाणी अदा केला जातो. बेघर झाल्याने रस्त्यावर आलेली कुटुंबे, साचलेले पाणी आणि त्यातच वाहनांमुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.लेकरांची माय बेशुद्ध पडलीपाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोटच्या पोरांची अवस्था आईला सहन न झाल्याने ती जागीच बेशुद्ध झाली.महापालिका अधिकारी दोन तास उशिरा पोहोचले!वांद्रे परिसरात इतकी मोठी घटना घडली तरी जवळपास दोन तास महापालिकेचा एकही अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केल्याचे एका खासगी संस्थेचे प्रमुख नामदेव गुल्दगड यांनी सांगितले. त्यांनी स्थानिकांसाठी जुने कपडे तसेच खाण्यापिण्याच्या सामानाची व्यवस्था केली.