शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महागड्या डाळींमुळे दिवाळीपूर्वीच दिवाळे

By admin | Updated: October 18, 2016 06:01 IST

दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर गगनाला भिडले आहेत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. एपीएमसीमध्ये पाच वर्षांपूर्वी चनाडाळ ३० ते ४० व तूरडाळ ३६ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी किरकोळ मार्केटमध्ये चनाडाळ १४० ते १६० रुपये किलो दराने विकली जाऊ लागली आहे. डाळी महागल्यामुळे दिवाळीपूर्वीच सामान्य नागरिकांचे दिवाळे निघाले आहे. महागाई कमी करण्यासाठी शासनाने डाळींसह भाजीपाला एपीएमसीमधून वगळला. परंतु यामुळे बाजारभाव कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. डाळींचे दर वाढल्याने आॅगस्टपासून दिवाळीपर्यंत तूरडाळ रेशनवर उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली होती. पण सणाच्या काळात तूरडाळ नव्हे तर चनाडाळीचा अधिक वापर होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. शासनाने गोदामांवर छापे मारून कारवाई केल्यासारखे भासविले. पण प्रत्यक्षात भाव कमी झालेच नाहीत. स्वस्त विक्री केंद्र उघडण्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. >पाच वर्षांत डाळ सामान्यांच्या आवाक्याबाहेर शासनाने डाळी एपीएमसीमधून वगळल्यामुळे या व्यापारावर कोणाचेही नियंत्रण नाही. व्यापारी मोठ्या प्रमाणात डाळींची साठेबाजी करत असल्यामुळे सण, उत्सवांच्या काळात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.डाळ २०१०एपीएमसी किरकोळचना ३० ते ४०११० ते १२४१४० ते १६०तूर ३६ ते ४३८० ते ११५१२८ ते १४०मूग २९ ते ३२६३ ते ७०१०० ते १२०मसूर २९ ते ३०५९ ते ७०१००