शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Coronavirus: कोरोनाने अडवली आंब्याची परदेशातील वाट; निर्यातीत ४० टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:47 IST

आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंधांचा परिणाम

सुहास शेलारमुंबई : कोरोनाने आंब्याची परदेशात जाण्याची वाट अडवली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या निर्यातीत जवळपास ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातून हवाई आणि जलमार्गे आंब्याची निर्यात होते. त्यातही जलद वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा प्रामुख्याने अवलंब केला जातो. एअर कार्गो सुविधेचे दर चढे असल्याने प्रवासी विमानांद्वारे आंबा निर्यात करण्यावर व्यापारी भर देतात. प्रवासी विमाने पार्सलसाठी राखीव असलेल्या जागेतून आंब्याचे वहन करतात. भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या जवळपास ९० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी विमानफेऱ्यांच्या संख्येवरही परिणाम झाल्याने आंब्याच्या निर्यातीत अडथळे येत आहेत.

गेल्या वर्षी प्रवासी विमानांच्या साहाय्याने ४९,६५९ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून जवळपास ४ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. परंतु, यंदा विमान प्रवासावरील निर्बंधांमुळे आतापर्यंत केवळ ३० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करता आला. त्यामुळे उत्पन्न २ हजार ३०० काेटी रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

वेळेत अंमलबजावणी झालीच नाहीजलवाहतुकीद्वारे आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करा, सुविधा वाढवा, अशा सूचना सरकारला केल्या होत्या. त्याची वेळीच अंमलबजावणी झाली असती तर हवाई वाहतुकीवरील अवलंबित्व संपले असते आणि सध्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळता आले असते. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघतूट भरून काढणे अवघडआंब्याच्या निर्यातीसाठी प्रवासी विमानांवर अवलंबून राहावे लागते, कारण एअर कार्गो सुविधेचे दर हे तिप्पट आहेत. यंदा प्रवासी विमानांच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका आंब्याच्या निर्यातीला बसला. निर्यातक्षम आंब्याचा हंगाम ओसरत आल्याने ही तूट भरून काढणे अवघड आहे. - रत्नाकर कराळे, आंबा निर्यातदार

टॅग्स :Mangoआंबाcorona virusकोरोना वायरस बातम्या