शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

Coronavirus: कोरोनाने अडवली आंब्याची परदेशातील वाट; निर्यातीत ४० टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:47 IST

आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंधांचा परिणाम

सुहास शेलारमुंबई : कोरोनाने आंब्याची परदेशात जाण्याची वाट अडवली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या निर्यातीत जवळपास ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातून हवाई आणि जलमार्गे आंब्याची निर्यात होते. त्यातही जलद वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा प्रामुख्याने अवलंब केला जातो. एअर कार्गो सुविधेचे दर चढे असल्याने प्रवासी विमानांद्वारे आंबा निर्यात करण्यावर व्यापारी भर देतात. प्रवासी विमाने पार्सलसाठी राखीव असलेल्या जागेतून आंब्याचे वहन करतात. भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या जवळपास ९० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी विमानफेऱ्यांच्या संख्येवरही परिणाम झाल्याने आंब्याच्या निर्यातीत अडथळे येत आहेत.

गेल्या वर्षी प्रवासी विमानांच्या साहाय्याने ४९,६५९ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून जवळपास ४ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. परंतु, यंदा विमान प्रवासावरील निर्बंधांमुळे आतापर्यंत केवळ ३० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करता आला. त्यामुळे उत्पन्न २ हजार ३०० काेटी रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

वेळेत अंमलबजावणी झालीच नाहीजलवाहतुकीद्वारे आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करा, सुविधा वाढवा, अशा सूचना सरकारला केल्या होत्या. त्याची वेळीच अंमलबजावणी झाली असती तर हवाई वाहतुकीवरील अवलंबित्व संपले असते आणि सध्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळता आले असते. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघतूट भरून काढणे अवघडआंब्याच्या निर्यातीसाठी प्रवासी विमानांवर अवलंबून राहावे लागते, कारण एअर कार्गो सुविधेचे दर हे तिप्पट आहेत. यंदा प्रवासी विमानांच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका आंब्याच्या निर्यातीला बसला. निर्यातक्षम आंब्याचा हंगाम ओसरत आल्याने ही तूट भरून काढणे अवघड आहे. - रत्नाकर कराळे, आंबा निर्यातदार

टॅग्स :Mangoआंबाcorona virusकोरोना वायरस बातम्या