शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच कोपर्डी खटल्यात तिघे दोषी - उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:58 IST

पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपींना विविध आठ कलमान्वये न्यायालयाने दोषी ठरविले आहे. पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.ते म्हणाले, घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळीच न्यायालयात सिद्ध करून दाखविली. मनुष्य खोटे बोलू शकतो, मात्र परिस्थिती खोटे बोलू शकत नाही, या म्हणीचे या खटल्यात प्रत्यंत्तर आले. आरोपी क्रमांक एकचा रक्तगट ‘ओ ग्रुप’ होता. पीडित मुलीचा रक्तगट ‘ए ग्रुप’चा होता. आरोपी एकच्या कपड्यावर जे रक्त मिळाले, ते ‘ए गु्रप’चे होते, असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे खटल्यात होते.घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी क्रमांक दोन आणि तीनचे कृत्य काय होते, याचे पुरावे न्यायालयाला दिले. ते सर्व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. अत्याचार करून खून करणे, अत्याचार व खूनाचा कट रचणे आणि अत्याचार व खुनासाठी प्रोत्साहित करणे यासाठी कायद्यात दोन शिक्षा आहेत.कमीत कमी जन्मठेप आणि फाशी. दोषसिद्धीनंतर सर्व पुराव्यांचा विचार करून न्याययोग्य शिक्षा देण्यासाठी पुढील युक्तिवाद करणार आहे.खटल्यात सोबत काम करणारे पोलीस अधिकारी, सामान्य जनता, पीडित मुलीचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक यांनी न घाबरता साक्ष दिली, त्या सर्वांचे हे यश आहे. जनतेने शांततेने खटल्याचा निकाल स्वीकारला पाहिजे आणि राज्यातील शांतता अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेलकोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती़ न्यायालयात तीनही आरोपींवर दोष सिद्ध झाल्याने समाधान आहे़ अपेक्षेप्रमाणे निकाल लागून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल़, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारी आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे असे अपराध पुन्हा घडणार नाहीत.- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसकोपर्डीसारखा गुन्हा पुन्हा होऊ नये. कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस‘ती’ स्त्री असल्याची आधीच शिक्षा मिळाली आहे़ तिच्यावर अत्याचार करणाºया आरोपींना न्यायालयाने दोषी धरल्याने मोठे समाधान आहे़ तिघा आरोपींना फाशी व्हावी.- आ. नीलम गोºहे, शिवसेना उपनेत्या

टॅग्स :Courtन्यायालय