शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच कोपर्डी खटल्यात तिघे दोषी - उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:58 IST

पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपींना विविध आठ कलमान्वये न्यायालयाने दोषी ठरविले आहे. पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.ते म्हणाले, घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळीच न्यायालयात सिद्ध करून दाखविली. मनुष्य खोटे बोलू शकतो, मात्र परिस्थिती खोटे बोलू शकत नाही, या म्हणीचे या खटल्यात प्रत्यंत्तर आले. आरोपी क्रमांक एकचा रक्तगट ‘ओ ग्रुप’ होता. पीडित मुलीचा रक्तगट ‘ए ग्रुप’चा होता. आरोपी एकच्या कपड्यावर जे रक्त मिळाले, ते ‘ए गु्रप’चे होते, असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे खटल्यात होते.घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी क्रमांक दोन आणि तीनचे कृत्य काय होते, याचे पुरावे न्यायालयाला दिले. ते सर्व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. अत्याचार करून खून करणे, अत्याचार व खूनाचा कट रचणे आणि अत्याचार व खुनासाठी प्रोत्साहित करणे यासाठी कायद्यात दोन शिक्षा आहेत.कमीत कमी जन्मठेप आणि फाशी. दोषसिद्धीनंतर सर्व पुराव्यांचा विचार करून न्याययोग्य शिक्षा देण्यासाठी पुढील युक्तिवाद करणार आहे.खटल्यात सोबत काम करणारे पोलीस अधिकारी, सामान्य जनता, पीडित मुलीचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक यांनी न घाबरता साक्ष दिली, त्या सर्वांचे हे यश आहे. जनतेने शांततेने खटल्याचा निकाल स्वीकारला पाहिजे आणि राज्यातील शांतता अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेलकोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती़ न्यायालयात तीनही आरोपींवर दोष सिद्ध झाल्याने समाधान आहे़ अपेक्षेप्रमाणे निकाल लागून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल़, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारी आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे असे अपराध पुन्हा घडणार नाहीत.- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसकोपर्डीसारखा गुन्हा पुन्हा होऊ नये. कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस‘ती’ स्त्री असल्याची आधीच शिक्षा मिळाली आहे़ तिच्यावर अत्याचार करणाºया आरोपींना न्यायालयाने दोषी धरल्याने मोठे समाधान आहे़ तिघा आरोपींना फाशी व्हावी.- आ. नीलम गोºहे, शिवसेना उपनेत्या

टॅग्स :Courtन्यायालय