शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

परिस्थितीजन्य पुराव्यांमुळेच कोपर्डी खटल्यात तिघे दोषी - उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:58 IST

पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपींना विविध आठ कलमान्वये न्यायालयाने दोषी ठरविले आहे. पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.ते म्हणाले, घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळीच न्यायालयात सिद्ध करून दाखविली. मनुष्य खोटे बोलू शकतो, मात्र परिस्थिती खोटे बोलू शकत नाही, या म्हणीचे या खटल्यात प्रत्यंत्तर आले. आरोपी क्रमांक एकचा रक्तगट ‘ओ ग्रुप’ होता. पीडित मुलीचा रक्तगट ‘ए ग्रुप’चा होता. आरोपी एकच्या कपड्यावर जे रक्त मिळाले, ते ‘ए गु्रप’चे होते, असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे खटल्यात होते.घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी क्रमांक दोन आणि तीनचे कृत्य काय होते, याचे पुरावे न्यायालयाला दिले. ते सर्व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. अत्याचार करून खून करणे, अत्याचार व खूनाचा कट रचणे आणि अत्याचार व खुनासाठी प्रोत्साहित करणे यासाठी कायद्यात दोन शिक्षा आहेत.कमीत कमी जन्मठेप आणि फाशी. दोषसिद्धीनंतर सर्व पुराव्यांचा विचार करून न्याययोग्य शिक्षा देण्यासाठी पुढील युक्तिवाद करणार आहे.खटल्यात सोबत काम करणारे पोलीस अधिकारी, सामान्य जनता, पीडित मुलीचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक यांनी न घाबरता साक्ष दिली, त्या सर्वांचे हे यश आहे. जनतेने शांततेने खटल्याचा निकाल स्वीकारला पाहिजे आणि राज्यातील शांतता अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेलकोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती़ न्यायालयात तीनही आरोपींवर दोष सिद्ध झाल्याने समाधान आहे़ अपेक्षेप्रमाणे निकाल लागून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल़, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारी आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे असे अपराध पुन्हा घडणार नाहीत.- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसकोपर्डीसारखा गुन्हा पुन्हा होऊ नये. कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस‘ती’ स्त्री असल्याची आधीच शिक्षा मिळाली आहे़ तिच्यावर अत्याचार करणाºया आरोपींना न्यायालयाने दोषी धरल्याने मोठे समाधान आहे़ तिघा आरोपींना फाशी व्हावी.- आ. नीलम गोºहे, शिवसेना उपनेत्या

टॅग्स :Courtन्यायालय