शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण ते वालोपे दरम्यान मालगाडी घसरली;

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

अनेक गाड्या रद्द; जीवितहानी नाही; गव्हाची वाहतूक करणारी मालगाडी, उमेदवारही पाहणीसाठी चौथा अपघात

चिपळूण : चिपळूण ते वालोपे रेल्वे दरम्यानच्या मार्गावर खेर्डी पुलाजवळ आज, मंगळवारी सकाळी ७.५५ च्या दरम्यान रुळ कट झाल्याने चाके निखळून मालगाडीचे ११ डबे घसरले. यातील पाच डबे खाली शेतात कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे कोकणातील अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.आज पहाटे कोकणकन्या व राज्यराणी एक्स्प्रेस रत्नागिरीकडे सुरक्षितपणे गेल्या. मात्र, पावणेआठ ते आठच्या दरम्यान चिपळूणनजीकच्या खेर्डी-माळेवाडी पुलाजवळ रुळ कट झाला होता. त्यानंतर मुंबईहून बंगलोरच्या दिशेने धावणारी मालगाडी येथे आली आणि तिचे ११ डबे घसरले. डब्याची चाके निखळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या गाडीतून गहू नेला जात होता. सकाळच्यावेळी अचानक रेल्वेचे डबे घसरून खाली आल्याचे अनेकांनी पाहिले आणि बघ्यांची गर्दी झाली. इंजिन काही डब्यांसह पुढे निघून गेले, तर रुळ कट झाल्याने दोन डब्यांमधील जोड तुटला. त्यामुळे हे डबे खाली पडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर कामथे रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली होती, तर मंगल एक्स्प्रेस सावर्डे रेल्वे स्थानकात उभी होती. या दोन्ही गाड्या परत पाठविण्यात आल्या. या मार्गावरील सर्व गाड्या आज रद्द करण्यात आल्या. काही गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. खेर्डी येथील रेल्वे पुलाचे ग्रील तुटून पडले. ट्रॅकखालील खडी खाली कोसळली. रुळांखालचे सिमेंटचे पोल चिरडून गेले. लोखंडी रुळ वाकडेतिकडे झाले. काही डब्यांची चाके निखळली. कोकण रेल्वेचे अधिकारी व इंजिनिअर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डबे बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रुळांची स्थिती पाहता उद्या, बुधवारी सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कामगार बचावलेरेल्वे टॅकच्या बाजूला खेर्डी पुलाजवळ १० ते १२ कामगारांच्या झोपड्या आहेत; परंतु चार दिवसांपूर्वी ते आपल्या गावी गेल्याने बालंबाल बचावले. पाच अपघातातील चौथी मालगाडीगेल्या काही महिन्यांत कोकण रेल्वे मार्गावरील डबे घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. खेड तालुक्यात करंजाडी येथे दोनवेळा मालगाडी घसरली होती. या दोन घटनांदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथेही मालगाडी रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला होता. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे पॅसेंजर घसरली होती. या चार घटनांपाठोपाठ आता पाचवी दुर्घटना घडली असून, या पाच अपघातांतील मालगाडी घसरण्याचा हा चौथा प्रकार आहे.देखभालीच्या दुर्लक्षामुळेच अपघात?कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण-कामथे दरम्यान झालेला मालगाडी अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत रेल्वे प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. अद्याप त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या १५ वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गाच्या रुळांची पूर्णत: देखभाल होणे आवश्यक होते. कोणत्या ठिकाणी रूळ खचलेले आहेत वा खराब झालेले आहेत याबाबतची माहिती तांत्रिक विभागाकडून प्रशासनाला दिली जाते. मात्र रेल्वे रूळ देखभालीबाबतच्या अनास्थेमुळेच आवश्यक ठिकाणी रुळ वा त्याखालील लाकडी, सिमेंट प्लेटस बदलल्या न गेल्याने व पॅसेंजर गाड्यांच्या तुलनेत मालगाड्यांचे अधिक वजन कमकुवत रुळांना मानवणारे नसल्यानेच रुळ फाकतात व अपघात होतात, असे रेल्वेच्याच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कामगार बचावलेरेल्वे ट्रॅकच्या बाजूला खेर्डी पुलाजवळ १० ते १२ कामगारांच्या झोपड्या आहेत; परंतु चार दिवसांपूर्वी ते आपल्या गावी गेल्याने बालंबाल बचावले. पाच अपघातातील चौथी मालगाडीगेल्या काही महिन्यांत कोकण रेल्वे मार्गावरील डबे घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. खेड तालुक्यात करंजाडी येथे दोनवेळा मालगाडी घसरली होती. या दोन घटनांदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथेही मालगाडी रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला होता. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे पॅसेंजर घसरली होती. या चार घटनांपाठोपाठ आता पाचवी दुर्घटना घडली असून, या पाच अपघातांतील मालगाडी घसरण्याचा हा चौथा प्रकार आहे.