शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळी गावाच्या संख्येत वाढ

By admin | Updated: January 1, 2015 01:24 IST

केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या

नागपूर विभाग : २७०० गावांची वाढनागपूर : केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या २०२९ होती आता ही संख्या ४८३२ झाली आहे.नजरअंदाज पैसेवारीनुसार नागपूर विभागात एकूण २०२९ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा खाली होती. त्यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, भंडारा जिल्ह्यातील ७ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ गावांचा समावेश होता. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करू लागल्याने सरकारवर टीका होऊ लागली होती. राज्य सरकारने तत्काळ केंद्राकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात केंद्रीय पथकाने दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. नागपूर विभागातही या पथकाने पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती व त्याच वेळी राज्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत सरासरी ५७०० गावांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सरकारने सुधारित पैसेवारी काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यानुसार विभागातील दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी ही संख्या २०२९ होती व आता ती ४८३२ झाली आहे. दुष्काळी भागातील खरीपांच्या सर्वच गावांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे. सुधारित अहवालानुसार नागपूर विभागात एकूण खरीप गावांची संख्या ७९४३ असून त्यापैकी ७७९६ गावांची पैसेवारी काढण्यात आली. त्यापैकी ४८३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी आहे, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)नागपूर जिल्ह्यात १२०० गावांची वाढनागपूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत तब्बल १२०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार जिल्ह्यात दुष्काळी गावांची संख्या ५९५ होती. आता सुधारित पैसेवारीनुसार ही संख्या १७९५ वर गेली आहे. सरासरी सर्वच खरीप गावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.