शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळी गावाच्या संख्येत वाढ

By admin | Updated: January 1, 2015 01:24 IST

केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या

नागपूर विभाग : २७०० गावांची वाढनागपूर : केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या २०२९ होती आता ही संख्या ४८३२ झाली आहे.नजरअंदाज पैसेवारीनुसार नागपूर विभागात एकूण २०२९ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा खाली होती. त्यात नागपूर जिल्ह्यातील ५२५, वर्धा जिल्ह्यातील १०४९, भंडारा जिल्ह्यातील ७ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ४४८ गावांचा समावेश होता. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करू लागल्याने सरकारवर टीका होऊ लागली होती. राज्य सरकारने तत्काळ केंद्राकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात केंद्रीय पथकाने दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. नागपूर विभागातही या पथकाने पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती व त्याच वेळी राज्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत सरासरी ५७०० गावांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सरकारने सुधारित पैसेवारी काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यानुसार विभागातील दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी ही संख्या २०२९ होती व आता ती ४८३२ झाली आहे. दुष्काळी भागातील खरीपांच्या सर्वच गावांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे. सुधारित अहवालानुसार नागपूर विभागात एकूण खरीप गावांची संख्या ७९४३ असून त्यापैकी ७७९६ गावांची पैसेवारी काढण्यात आली. त्यापैकी ४८३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी आहे, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)नागपूर जिल्ह्यात १२०० गावांची वाढनागपूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येत तब्बल १२०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार जिल्ह्यात दुष्काळी गावांची संख्या ५९५ होती. आता सुधारित पैसेवारीनुसार ही संख्या १७९५ वर गेली आहे. सरासरी सर्वच खरीप गावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.