शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी, नुकसानभरपाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 20:31 IST

परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

लातूर : परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. दरम्यान, बोगस बियाणांमुळे शेतकºयांना मात्र दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणीची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी मनसेने केली असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख ४ हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. उगवणशक्ती कमी असलेल्या सोयाबीनच्या बियाणांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांना त्याचा फटका बसला आहे. नव्हे, त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान शेतक-यांचे आहे. शेतक-यांचे हे नुकसान कृषी विभाग, बियाणे कंपन्या व विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळेच झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. बियाणे विक्रीस आणण्यापूर्वी कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण विभागाने बियाणांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे होते. मात्र कंपन्यांशी साटेलोटे असल्यामुळे उगवणक्षमता तपासली गेली नाही. कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी करून व त्याच्या बियाणे बॅगा तयार करून विक्रेत्यांच्या मदतीने शेतक-यांना विकल्या. अशा जवळपास २१ कंपन्यांचे नमुने परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत नापास झाले आहे. हे वाण कोणत्या कोणत्या शेतक-यांना विकले याची यादी विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याने त्या यादीनुसार सरसकट सर्व शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी. पेरणीच्या गडबडीत बियाणे न उगवलेल्या शेतक-यांना न उगवल्याची तक्रार करता आली नाही. त्यामुळे ज्या शेतक-यांची तक्रार आली नाही, त्यांनाही मदत करावी, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शेतक-यांना फसविणा-या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, भास्कर औताडे, रवि सूर्यवंशी, बाळासाहेब मुंडे यांनी दिला आहे.