शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी, नुकसानभरपाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 20:31 IST

परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

लातूर : परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. दरम्यान, बोगस बियाणांमुळे शेतकºयांना मात्र दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणीची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी मनसेने केली असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख ४ हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. उगवणशक्ती कमी असलेल्या सोयाबीनच्या बियाणांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांना त्याचा फटका बसला आहे. नव्हे, त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान शेतक-यांचे आहे. शेतक-यांचे हे नुकसान कृषी विभाग, बियाणे कंपन्या व विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळेच झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. बियाणे विक्रीस आणण्यापूर्वी कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण विभागाने बियाणांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे होते. मात्र कंपन्यांशी साटेलोटे असल्यामुळे उगवणक्षमता तपासली गेली नाही. कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी करून व त्याच्या बियाणे बॅगा तयार करून विक्रेत्यांच्या मदतीने शेतक-यांना विकल्या. अशा जवळपास २१ कंपन्यांचे नमुने परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत नापास झाले आहे. हे वाण कोणत्या कोणत्या शेतक-यांना विकले याची यादी विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याने त्या यादीनुसार सरसकट सर्व शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी. पेरणीच्या गडबडीत बियाणे न उगवलेल्या शेतक-यांना न उगवल्याची तक्रार करता आली नाही. त्यामुळे ज्या शेतक-यांची तक्रार आली नाही, त्यांनाही मदत करावी, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शेतक-यांना फसविणा-या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, भास्कर औताडे, रवि सूर्यवंशी, बाळासाहेब मुंडे यांनी दिला आहे.