शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी, नुकसानभरपाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 20:31 IST

परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

लातूर : परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. दरम्यान, बोगस बियाणांमुळे शेतकºयांना मात्र दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणीची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी मनसेने केली असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख ४ हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. उगवणशक्ती कमी असलेल्या सोयाबीनच्या बियाणांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांना त्याचा फटका बसला आहे. नव्हे, त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान शेतक-यांचे आहे. शेतक-यांचे हे नुकसान कृषी विभाग, बियाणे कंपन्या व विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळेच झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. बियाणे विक्रीस आणण्यापूर्वी कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण विभागाने बियाणांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे होते. मात्र कंपन्यांशी साटेलोटे असल्यामुळे उगवणक्षमता तपासली गेली नाही. कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी करून व त्याच्या बियाणे बॅगा तयार करून विक्रेत्यांच्या मदतीने शेतक-यांना विकल्या. अशा जवळपास २१ कंपन्यांचे नमुने परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत नापास झाले आहे. हे वाण कोणत्या कोणत्या शेतक-यांना विकले याची यादी विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याने त्या यादीनुसार सरसकट सर्व शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी. पेरणीच्या गडबडीत बियाणे न उगवलेल्या शेतक-यांना न उगवल्याची तक्रार करता आली नाही. त्यामुळे ज्या शेतक-यांची तक्रार आली नाही, त्यांनाही मदत करावी, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शेतक-यांना फसविणा-या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, भास्कर औताडे, रवि सूर्यवंशी, बाळासाहेब मुंडे यांनी दिला आहे.