शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दुष्काळ जाहीर

By admin | Updated: October 17, 2015 03:30 IST

राज्यातील सुमारे ४० हजार गावांपैकी तब्बल १४ हजार ७०८ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी आल्यामुळे या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून

मुंबई : राज्यातील सुमारे ४० हजार गावांपैकी तब्बल १४ हजार ७०८ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी आल्यामुळे या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांतील कृषीपंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि जमीन महसुलात सूट देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.राज्यात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी पावसाच्या ७५ टक्केपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. राज्यातील १८९ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे १४७०८ गावांची नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असून, २५३४५ गावांची पैसेवारी ५० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे केंद्राकडे मदतीसाठी मागणी करण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत सुधारित पैसेवारीची वाट न पाहता तातडीने प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री खडसे यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना लागू करताना तालुकाऐवजी गाव हा घटक मानण्यात येईल. ज्या गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी आहे, ती गावे या मदतीसाठी पात्र असतील. या गावांमध्ये जमीन राज्यात दुष्काळ जाहीर!(पान १ वरून) महसूलात सूट देण्यात येईल, आवश्यकता भासल्यास पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरु करण्यात येतील. या गावातील कृषी पंपांच्या वीज जोडण्या खंडीत केल्या जाणार नाहीत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कापूस तसेच सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीने सुरु करावेत असे निर्देशही देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी).................................मदत तेव्हा आणि आताआघाडी सरकारच्या काळात १९ आॅगस्ट २०१४ रोजी राज्यातील १२३ तालुक्यात टंचाई परिस्थिती जाहीर केली होती. त्यावेळी कृषीपंपाच्या चालू वीज बिलामध्ये ३३ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क व शेतसारा माफ करण्यात आला होता.युती सरकारने कृषी पंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसूलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स आणि टंचाई जाहीर झालेल्या गावातील कृषी पंपाची वीज खंडीत न करणे, असे निर्णय घेतले आहेत..................................................उशीरा सूचलेलं शहाणपण-मुंडेराज्यात टंचाईसदृष्य उपाययोजना लागू करण्याचा निर्णय हा उशीरा सूचलेलं शहाणपण असून या निर्णयाने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा तर मिळाला नाहीच उलट त्यांचे खच्चीकरण झाले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्य शासनाने केंद्राच्या निकषांप्रमाणे मदत जाहीर करुन स्वस्थ न बसता त्याव्यतिरिक्त स्वत:च्या तिजोरीतूनही मदत करावी, अन्यथा पेट्रोल-डिझेलवरील दुष्काळ कर रद्द करावा, अशी मागणीही मुंडे यांनी केली..............................दुष्काळ की दुष्काळसदृष्य?राज्यातील सुमारे चौदा हजार गावात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याची घोषणा सरकारने केली असली, तरी जाहीर केलेल्या उपाययोजना मात्र दृष्काळसदृष्य परिस्थितीत करावयाच्याच आहेत. याबाबत महसूल मंत्री खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषांमुळे ‘सदृष्य’ शब्द वगळण्यात आला असून सरसकट दुष्काळ जाहीर केला आहे..................................दुष्काळग्रस्त गावांची जिल्हानिहाय संख्या :नाशिक१५७७धुळे६१४नंदूरबार८८५जळगाव१२५८ अहमदनगर५३५पुणे ७६सातारा३४३सांगली३६३औरंगाबाद१३५३जालना९६९परभणी८४८हिंगोली७०७नांदेड१५६२बीड१४०३लातूर९४३उस्मानाबाद ८३७अकोला५५यवतमाळ २नागपूर१११गडचिरोली३६७>>>>>>>>>>>>>>>>>>कर्जमाफी द्या-विखेसरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. दुष्काळ जाहीर करावा यासाठी आम्ही गेल्या चार-पाच महिन्यांपासून आंदोलन करत होतो. आधी दुष्काळाच्या नावाने कर लादला आणि नंतर दुष्काळ जाहीर केला. सरकारने जाहीर केलेल्या सवलतींवर आम्ही समाधानी नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, ही मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते विखे यांनी सांगितले.>>काय झाले होते?-खडसेआघाडी सरकारच्या काळात सातत्याने दुष्काळ पडत होता. तेव्हा दुष्काळ जाहीर करा, असे आम्ही वारंवार सांगत होतो. पण काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दुष्काळ जाहीर केला नव्हता. वास्तविक, दुष्काळ जाहीर करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागत असताना आम्ही आज तत्काळ बैठक घेतली व निर्णय जाहीर केला, असे महसूल मंत्री खडसे यांनी सांगितले.