शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग ?

By admin | Updated: July 16, 2015 04:04 IST

मान्सूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात टंचाईची स्थिती उद्भवण्याची स्थिती असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाच्या

पुणे : मान्सूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात टंचाईची स्थिती उद्भवण्याची स्थिती असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसण्याची भीती आहे.राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असून लातूर व परभणी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने भाकीत वर्तविले होते. त्यावरून महाराष्ट्रातही यंदा कमी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बळीराजा आधीपासूनच चिंतेत आहे. त्यातच पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ््यात पाणी आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी खरीपाची पेरणी झाली आहे. सुरवातीच्या पावसामुळे पिकांची उगवण झाली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके जळू लागली आहेत. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.१५ जिल्ह्यांत सरासरीराज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा २० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला तरी तो सरासरीएवढाच समजला जातो. त्यानुसार १५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण आतापर्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त, अमरावतीत १६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.