शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खाई त्याला खवखवे

By admin | Updated: October 18, 2016 04:03 IST

टळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात.

- मिलिंद बेल्हेटळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात. आयत्या वेळचे पाहुणे म्हणून तुमच्यासाठी जेवण रांधलं जातं. पटकन तयार होणारा पिठलंभाताचा बेत. दारच्या पळसाच्या मोठ्या हिरव्यागार पानावर तो ऊनऊन भात नि त्याच्या मधोमध वाढलेलं पिवळंधम्मक सरसरीत पिठलं. तुम्ही आडवा हात मारता. मध्येच पिठल्याचा भुरका घेत झकास दाद देता. पूर्णब्रह्म म्हणजे दुसरं काय हो! खाणं हा तुमचा वीक (की स्ट्राँग) पॉइंट असला की, तुमचं कुठे काहीही अडत नाही. फक्त खायला मिळायला हवं. ते चवीचं असायला हवं. मग, खाण्यासाठी जन्म अपुला...! खाल तसे व्हाल... खाल्ल्या मिठाला जागणे... खा-खा सुटणे... आयत्या पिठावर रेघोट्या... साखरेचे खाणार त्याला... असे सारे वाकप्रचार आणि म्हणी आपोआप चपखल लागू पडतात.अन्न दिन साजरा करताना आपण बदलत्या हवामानानुसार बदलतं पिकवायला पाहिजे, असं यंदा सांगताहेत. तसंच बदलत्या हवामानानुसार म्हणजे हवा बदलेल तसं बदलतं खायला पाहिजे, असाही संदेश द्यायला हवा. माणसानं कसं खातखात राहिलं पाहिजे. तसं केलं नाही, तर मग आसेतुहिमाचल पसरलेल्या या देशातील प्रांत, विभाग, जातींनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं...?जेवण मग ते चुलीवरचं असो की मायक्रोवेव्हमधलं. मातीच्या भांड्यातलं असो की नॉनस्टिक पॅनमधलं. त्यातील पदार्थ, मसाले, बनवण्याच्या पद्धतीतून ते देऊन जातं रसास्वाद.खा, पण बेतानं... पथ्य पाळा, हे सांगणं जरी असलं तरी पंगतीत बयायचं, आग्रह करकरून वाढायचं, आकंठ जेवायचं नि नंतर पोटाला तडस लागली म्हणून शतपावली घाल्त ते पचवायचं, हेही एक शास्त्रच आहे की!काय खाल्लं, यापेक्षा कसं खाल्लं आणि किती खाल्लं, यालाही महत्त्व असतं. हिरव्याकंच केळीच्या पानावर मऊ गुरगुट्या भात, त्यावर तूप किंवा केशरी मेतकूट... सोबत, लालबुंद पोह्याचा पापड किंवा चटकदार लोणचं यांचं वर्णन जरी समोर आलं तरी भूक लागते. एखादी मस्तपैकी उकड, पोहे किंवा उप्पीट... गरमागरम घावणं किंवा अगदीच काही नसलं तरी कुस्करलेली भाकरी, पोळी, पोहे असा कोणताही नाश्ता असो तो आनंद देऊनच जातो. त्यामुळे खाणं हेच जगणं मानायला हवं.माणसं इतकी शास्त्रानुसार वागली असती, तर मग ‘अधिक धान्य पिकवा’सारख्या मोहिमांना तरी काय अर्थ उरला असता! ...आणि लालबुंद झालेल्या तोंडात पान खाऊन गोळा झालेला मुखरस सावरतसावरत गप्पाही रंगल्या नसत्या. त्यामुळे जागतिक अन्न दिनानिमित्त भरपूर खाण्याचा आणि ते पचवण्याचाही संकल्प करायलाच हवा, नाही का?तुम्ही खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खाता, हा प्रश्नच फिजुल आहे. वेगळ्या चवीचं, वेगळ्या स्वादाचं समोर जे येईल, ते भक्षण करण्याची तुमची क्षमता असेल, तर मग रोजच अन्न दिन होईल साजरा...>जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्मसाधं लोणचं, चटणी, कोशिंबीर, पंचांमृत, रायतं असं डावीकडचे खाणे असो वा त्याच्याशेजारी ठाण मांडून बसणारे भजी, पापड, कुरडयांसारखे कुरकुरणारे पदार्थ असोत... तळणाच्या पदार्थातही भजी म्हटलं की, पाचपंधरा प्रकार समोर येतात... भाताचेही पांढऱ्यापासून वेगळे प्रकार... पोळ्या, भाज्या, रस्सा, उसळी, कढी, सार, आमटी, फतफत्यासारख्या भाज्या, त्यांचे गुण किती वर्णावे? पानाच्या मधोमध बसून तोंड गोड करणारे मिष्टान्न कल्पनेनेच गोडवा आणतात. गोडधोड म्हटलं की, हल्ली खिरीच्या वाटेला पटकन कोणी जात नाही. बंगाली मिठाया, कस्टर्ड, पुडिंग, आइस्क्र ीमच अनेकांना आठवतं. पण खीर, पुरण, आमरस, सुधारस, पाकातल्या पुऱ्या, बासुंदी, श्रीखंड, शिरा, लाडू, जिलेबी... पुरणपोळी, गूळपोळी, खव्याची पोळी, सांजापोळी, करंज्या असे नाना प्रकार ज्यांनी पंक्तीला बसवलेत, त्यांनी त्याचा आनंद किती लुटावा?