शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

खाई त्याला खवखवे

By admin | Updated: October 18, 2016 04:03 IST

टळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात.

- मिलिंद बेल्हेटळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात. आयत्या वेळचे पाहुणे म्हणून तुमच्यासाठी जेवण रांधलं जातं. पटकन तयार होणारा पिठलंभाताचा बेत. दारच्या पळसाच्या मोठ्या हिरव्यागार पानावर तो ऊनऊन भात नि त्याच्या मधोमध वाढलेलं पिवळंधम्मक सरसरीत पिठलं. तुम्ही आडवा हात मारता. मध्येच पिठल्याचा भुरका घेत झकास दाद देता. पूर्णब्रह्म म्हणजे दुसरं काय हो! खाणं हा तुमचा वीक (की स्ट्राँग) पॉइंट असला की, तुमचं कुठे काहीही अडत नाही. फक्त खायला मिळायला हवं. ते चवीचं असायला हवं. मग, खाण्यासाठी जन्म अपुला...! खाल तसे व्हाल... खाल्ल्या मिठाला जागणे... खा-खा सुटणे... आयत्या पिठावर रेघोट्या... साखरेचे खाणार त्याला... असे सारे वाकप्रचार आणि म्हणी आपोआप चपखल लागू पडतात.अन्न दिन साजरा करताना आपण बदलत्या हवामानानुसार बदलतं पिकवायला पाहिजे, असं यंदा सांगताहेत. तसंच बदलत्या हवामानानुसार म्हणजे हवा बदलेल तसं बदलतं खायला पाहिजे, असाही संदेश द्यायला हवा. माणसानं कसं खातखात राहिलं पाहिजे. तसं केलं नाही, तर मग आसेतुहिमाचल पसरलेल्या या देशातील प्रांत, विभाग, जातींनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं...?जेवण मग ते चुलीवरचं असो की मायक्रोवेव्हमधलं. मातीच्या भांड्यातलं असो की नॉनस्टिक पॅनमधलं. त्यातील पदार्थ, मसाले, बनवण्याच्या पद्धतीतून ते देऊन जातं रसास्वाद.खा, पण बेतानं... पथ्य पाळा, हे सांगणं जरी असलं तरी पंगतीत बयायचं, आग्रह करकरून वाढायचं, आकंठ जेवायचं नि नंतर पोटाला तडस लागली म्हणून शतपावली घाल्त ते पचवायचं, हेही एक शास्त्रच आहे की!काय खाल्लं, यापेक्षा कसं खाल्लं आणि किती खाल्लं, यालाही महत्त्व असतं. हिरव्याकंच केळीच्या पानावर मऊ गुरगुट्या भात, त्यावर तूप किंवा केशरी मेतकूट... सोबत, लालबुंद पोह्याचा पापड किंवा चटकदार लोणचं यांचं वर्णन जरी समोर आलं तरी भूक लागते. एखादी मस्तपैकी उकड, पोहे किंवा उप्पीट... गरमागरम घावणं किंवा अगदीच काही नसलं तरी कुस्करलेली भाकरी, पोळी, पोहे असा कोणताही नाश्ता असो तो आनंद देऊनच जातो. त्यामुळे खाणं हेच जगणं मानायला हवं.माणसं इतकी शास्त्रानुसार वागली असती, तर मग ‘अधिक धान्य पिकवा’सारख्या मोहिमांना तरी काय अर्थ उरला असता! ...आणि लालबुंद झालेल्या तोंडात पान खाऊन गोळा झालेला मुखरस सावरतसावरत गप्पाही रंगल्या नसत्या. त्यामुळे जागतिक अन्न दिनानिमित्त भरपूर खाण्याचा आणि ते पचवण्याचाही संकल्प करायलाच हवा, नाही का?तुम्ही खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खाता, हा प्रश्नच फिजुल आहे. वेगळ्या चवीचं, वेगळ्या स्वादाचं समोर जे येईल, ते भक्षण करण्याची तुमची क्षमता असेल, तर मग रोजच अन्न दिन होईल साजरा...>जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्मसाधं लोणचं, चटणी, कोशिंबीर, पंचांमृत, रायतं असं डावीकडचे खाणे असो वा त्याच्याशेजारी ठाण मांडून बसणारे भजी, पापड, कुरडयांसारखे कुरकुरणारे पदार्थ असोत... तळणाच्या पदार्थातही भजी म्हटलं की, पाचपंधरा प्रकार समोर येतात... भाताचेही पांढऱ्यापासून वेगळे प्रकार... पोळ्या, भाज्या, रस्सा, उसळी, कढी, सार, आमटी, फतफत्यासारख्या भाज्या, त्यांचे गुण किती वर्णावे? पानाच्या मधोमध बसून तोंड गोड करणारे मिष्टान्न कल्पनेनेच गोडवा आणतात. गोडधोड म्हटलं की, हल्ली खिरीच्या वाटेला पटकन कोणी जात नाही. बंगाली मिठाया, कस्टर्ड, पुडिंग, आइस्क्र ीमच अनेकांना आठवतं. पण खीर, पुरण, आमरस, सुधारस, पाकातल्या पुऱ्या, बासुंदी, श्रीखंड, शिरा, लाडू, जिलेबी... पुरणपोळी, गूळपोळी, खव्याची पोळी, सांजापोळी, करंज्या असे नाना प्रकार ज्यांनी पंक्तीला बसवलेत, त्यांनी त्याचा आनंद किती लुटावा?