शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

खाई त्याला खवखवे

By admin | Updated: October 18, 2016 04:03 IST

टळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात.

- मिलिंद बेल्हेटळटळीत दुपारची वेळ. तुम्ही कुठंतरी खेडेगावात किंवा आडवळणाच्या गावात आहात. आयत्या वेळचे पाहुणे म्हणून तुमच्यासाठी जेवण रांधलं जातं. पटकन तयार होणारा पिठलंभाताचा बेत. दारच्या पळसाच्या मोठ्या हिरव्यागार पानावर तो ऊनऊन भात नि त्याच्या मधोमध वाढलेलं पिवळंधम्मक सरसरीत पिठलं. तुम्ही आडवा हात मारता. मध्येच पिठल्याचा भुरका घेत झकास दाद देता. पूर्णब्रह्म म्हणजे दुसरं काय हो! खाणं हा तुमचा वीक (की स्ट्राँग) पॉइंट असला की, तुमचं कुठे काहीही अडत नाही. फक्त खायला मिळायला हवं. ते चवीचं असायला हवं. मग, खाण्यासाठी जन्म अपुला...! खाल तसे व्हाल... खाल्ल्या मिठाला जागणे... खा-खा सुटणे... आयत्या पिठावर रेघोट्या... साखरेचे खाणार त्याला... असे सारे वाकप्रचार आणि म्हणी आपोआप चपखल लागू पडतात.अन्न दिन साजरा करताना आपण बदलत्या हवामानानुसार बदलतं पिकवायला पाहिजे, असं यंदा सांगताहेत. तसंच बदलत्या हवामानानुसार म्हणजे हवा बदलेल तसं बदलतं खायला पाहिजे, असाही संदेश द्यायला हवा. माणसानं कसं खातखात राहिलं पाहिजे. तसं केलं नाही, तर मग आसेतुहिमाचल पसरलेल्या या देशातील प्रांत, विभाग, जातींनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं...?जेवण मग ते चुलीवरचं असो की मायक्रोवेव्हमधलं. मातीच्या भांड्यातलं असो की नॉनस्टिक पॅनमधलं. त्यातील पदार्थ, मसाले, बनवण्याच्या पद्धतीतून ते देऊन जातं रसास्वाद.खा, पण बेतानं... पथ्य पाळा, हे सांगणं जरी असलं तरी पंगतीत बयायचं, आग्रह करकरून वाढायचं, आकंठ जेवायचं नि नंतर पोटाला तडस लागली म्हणून शतपावली घाल्त ते पचवायचं, हेही एक शास्त्रच आहे की!काय खाल्लं, यापेक्षा कसं खाल्लं आणि किती खाल्लं, यालाही महत्त्व असतं. हिरव्याकंच केळीच्या पानावर मऊ गुरगुट्या भात, त्यावर तूप किंवा केशरी मेतकूट... सोबत, लालबुंद पोह्याचा पापड किंवा चटकदार लोणचं यांचं वर्णन जरी समोर आलं तरी भूक लागते. एखादी मस्तपैकी उकड, पोहे किंवा उप्पीट... गरमागरम घावणं किंवा अगदीच काही नसलं तरी कुस्करलेली भाकरी, पोळी, पोहे असा कोणताही नाश्ता असो तो आनंद देऊनच जातो. त्यामुळे खाणं हेच जगणं मानायला हवं.माणसं इतकी शास्त्रानुसार वागली असती, तर मग ‘अधिक धान्य पिकवा’सारख्या मोहिमांना तरी काय अर्थ उरला असता! ...आणि लालबुंद झालेल्या तोंडात पान खाऊन गोळा झालेला मुखरस सावरतसावरत गप्पाही रंगल्या नसत्या. त्यामुळे जागतिक अन्न दिनानिमित्त भरपूर खाण्याचा आणि ते पचवण्याचाही संकल्प करायलाच हवा, नाही का?तुम्ही खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खाता, हा प्रश्नच फिजुल आहे. वेगळ्या चवीचं, वेगळ्या स्वादाचं समोर जे येईल, ते भक्षण करण्याची तुमची क्षमता असेल, तर मग रोजच अन्न दिन होईल साजरा...>जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्मसाधं लोणचं, चटणी, कोशिंबीर, पंचांमृत, रायतं असं डावीकडचे खाणे असो वा त्याच्याशेजारी ठाण मांडून बसणारे भजी, पापड, कुरडयांसारखे कुरकुरणारे पदार्थ असोत... तळणाच्या पदार्थातही भजी म्हटलं की, पाचपंधरा प्रकार समोर येतात... भाताचेही पांढऱ्यापासून वेगळे प्रकार... पोळ्या, भाज्या, रस्सा, उसळी, कढी, सार, आमटी, फतफत्यासारख्या भाज्या, त्यांचे गुण किती वर्णावे? पानाच्या मधोमध बसून तोंड गोड करणारे मिष्टान्न कल्पनेनेच गोडवा आणतात. गोडधोड म्हटलं की, हल्ली खिरीच्या वाटेला पटकन कोणी जात नाही. बंगाली मिठाया, कस्टर्ड, पुडिंग, आइस्क्र ीमच अनेकांना आठवतं. पण खीर, पुरण, आमरस, सुधारस, पाकातल्या पुऱ्या, बासुंदी, श्रीखंड, शिरा, लाडू, जिलेबी... पुरणपोळी, गूळपोळी, खव्याची पोळी, सांजापोळी, करंज्या असे नाना प्रकार ज्यांनी पंक्तीला बसवलेत, त्यांनी त्याचा आनंद किती लुटावा?