शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन विदर्भ’ची स्वप्नपूर्ती करा

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

पुढील काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनीसुद्धा या बदलाचा पुढाकार घ्यावा व मेक इन विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा,

मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन : हिंगणा एमआयडीसी असो.चा वर्धापनदिननागपूर : पुढील काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनीसुद्धा या बदलाचा पुढाकार घ्यावा व मेक इन विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हिंगणा एमआयडीसी असोसिएशनच्या वर्धापनदिन समारंभात उद्योजकांना केले. मंचावर खासदार कृपाल तुमाने, असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी.एम. रणधीर, उपाध्यक्ष जी.एल. निमा व सचिव चंद्रशेखर शेगावकर होते. भारताबद्दल जगातील उद्योगपतींना कुतूहलमुख्यमंत्री म्हणाले की, जगातील औद्योगिक वातावरण झपाट्याने बदलत आहे. भारताबद्दल जगातील उद्योगपतींना कुतुहूल आहे. आपल्या देशात गुंतवणूक करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. डावोस येथील जागतिक इकॉनॉमिक फोरमच्या सभेत मला हे चित्र जाणवले. जगातील उद्योजकांसोबत संवाद साधून गुंतवणूक वाढविण्याच्या प्रयत्नासोबतच देशातील उद्योजकांसोबत संवाद वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना पूर्ण करण्यात येईल.कामगार कायदे सोपे करूउद्योग वाढीसाठी कामगार कायदे अडचणीचे ठरू नये, यासाठी सर्व समावेशक असा कामगार कायदा तयार करण्याचे प्रयत्न आहे. उद्योग आणि कामगारांच्या हिताचा सर्वसमावेशक धोरण असणारा कामगार कायदा असल्यास उद्योग वाढीसाठी त्याचा निश्चितपणे फायदा होतो. कुशल कामगार निर्मितीसाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. उद्योगांमध्ये कशा प्रकारच्या कुशलतेची गरज आहे, याची वेळोवेळी शासनास माहिती दिल्यास त्या दिशेने प्रयत्न करता येईल. यासंदर्भातला मसूदा शासन तयार करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.प्रास्तविक भाषण असोसिएशनचे अध्यक्ष सी.एम. रणधीर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात हिंगणा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात कामगार काम करीत असल्यामुळे एक सुसज्ज रुग्णालय तसेच इतर मागण्यांचा उल्लेख केला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर बेंद्रे व अमित पचेरीवाला, चंद्रशेखर शेगावकर, सहसचिव के.के. डागा व समीर खोसला, कार्यकारी सदस्य गणेश जयस्वाल, नारायण गुप्ता, एस.एम. पटवर्धन, अरुण लांजेवार, सचिन जैन यांच्यासह महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्रचे प्रकल्प प्रमुख आशुतोष त्रिपाठी, राजकुमार चोखाली आणि उद्योजक उपस्थित होते.संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)उद्योग मित्र संकल्पना आवश्यकउद्योग जगतातील अडचणी सोडविण्यासाठी उद्योग मित्र ही संकल्पना आवश्यक आहे, पण केवळ त्या ठिकाणी न थांबता थेट शासनाशी संवाद केल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात. प्रादेशिक अधिकाऱ्यांना तसे अधिकार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगपतींचा सत्कारउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी गोपाळ शिराळकर, आशुतोश दास आणि विनायक गान या उद्योगपतींचा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष बसंतलाल शाह, डी.के. तापडिया, राजीव पांडे, एस. रामलिंगम, चंदर खोसला, एस.के. मित्रा आदींचा सत्कार करण्यात आला.