शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

नाले अडकले गाळात

By admin | Updated: May 30, 2016 01:58 IST

नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़

मुंबई : मान्सूनपूर्व कामांची मुदत संपण्यास अवघे ४८ तास उरले आहेत़ नाल्यांची सफाई, गाळाची विल्हेवाट, नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र पश्चिम व पूर्व उपनगरांपाठोपाठ शहर भागातील नाल्यांचीही थोड्याफार फरकाने तीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे़>वडाळ्यात डास आणि दुर्गंधीकोरबा मिठागर येथील सर्व नाल्यांमधील गाळ काढल्यानंतरही त्याची विल्हेवाट लावण्याचे काम धिम्या गतीने सुरूआहे़ नाल्याच्या तोंडावरच गाळ पडून असल्याने हा गाळ पावसाळ्यात पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका आहे़ नाल्यातील गाळाच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नाक मुठीत घेऊन राहावे लागते़ गाळामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे आरोग्यही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे़ वडाळा पूर्व येथील आदर्श रमाई नालाही कचऱ्याने भरलेला असतो़ त्यामुळे पावसाळ्यात भरतीच्या वेळी आसपासच्या परिसरात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे़, तर पारधीनगर नाल्याची हीच अवस्था आहे़>धारावीतील नाले तुंबलेले विभागांतर्गत नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहेत़ धारावी विभागांतर्गत नाले आजही गाळाने भरलेले आहेत़ धारावी क्रॉस रोडवरील अनेक वस्त्यांचे सांडपाणी या नाल्यात सोडले जाते़ त्यामुळे येथे कचरा साचलेला असतो़ परिणामी, नाल्यातील सांडपाणी वाहून जात नाही़ दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव हा त्रास येथेही आहे़ >माटुंगा लेबर कॅम्पदादर-माटुंगा-माहीमहून धारावी खाडीला जोडण्यात आलेला नाला कचऱ्याने भरलेला असतो़ माटुंगा लेबर कॅम्प नाल्यामध्ये सफाईनंतरही कचरा दिसून येतो़ त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती आहे़ या नाल्याच्या सफाईचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रखडला होता़ तसेच जी उत्तर व जी दक्षिण या प्रभागात हा प्रस्ताव रखडल्यामुळे या कामाला विलंबच झाला़ >नाले उपनगरांतील असो अथवा शहरातील,सर्व ठिकाणी एकच समस्या प्रामुख्याने दिसून आली आहे़ नाल्यांची सफाई केल्यानंतरही स्थानिक रहिवासी नाल्यात कचरा टाकतात़ त्यामुळे नाला पुन्हा प्लॅस्टिक, बांधकामाचे साहित्य अशा टाकाऊ वस्तंूनी भरून जातो़ कुर्ला येथील श्रमजीवी नाला, मालाड येथील कुरार व्हिलेज आणि मालवणी नाला, गोवंडी येथील रफिकनगर नाला, अंधेरीचा मोगरा नाला, वांद्रे येथील बेहरामपाडा आणि एअरपोर्ट नाल्यांमध्ये स्थानिक रहिवासी कचरा टाकत असल्याचे पालिकेला दिसून आले आहे़ घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही वर्षांपूर्वी नाल्यांच्या परिसरातील झोपडपट्टींसाठी कचऱ्याचे डबे बसविण्याची शिफारस केली होती़ या डब्यात नागरिकांनी कचरा टाकल्यास नाला साफ राहील, असा दावा या विभागाने केला होता़ मात्र हा पर्याय प्रशासनाने अमान्य केला़ वारंवार ताकीद देऊनही रहिवासी पालिकेला जुमानत नसल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे़ त्यानुसार नाल्यात कचरा टाकणाऱ्यांकडून २०० ते १००० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे़