शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नाले अडकले गाळात

By admin | Updated: May 30, 2016 01:58 IST

नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़

मुंबई : मान्सूनपूर्व कामांची मुदत संपण्यास अवघे ४८ तास उरले आहेत़ नाल्यांची सफाई, गाळाची विल्हेवाट, नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र पश्चिम व पूर्व उपनगरांपाठोपाठ शहर भागातील नाल्यांचीही थोड्याफार फरकाने तीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे़>वडाळ्यात डास आणि दुर्गंधीकोरबा मिठागर येथील सर्व नाल्यांमधील गाळ काढल्यानंतरही त्याची विल्हेवाट लावण्याचे काम धिम्या गतीने सुरूआहे़ नाल्याच्या तोंडावरच गाळ पडून असल्याने हा गाळ पावसाळ्यात पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका आहे़ नाल्यातील गाळाच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नाक मुठीत घेऊन राहावे लागते़ गाळामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे आरोग्यही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे़ वडाळा पूर्व येथील आदर्श रमाई नालाही कचऱ्याने भरलेला असतो़ त्यामुळे पावसाळ्यात भरतीच्या वेळी आसपासच्या परिसरात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे़, तर पारधीनगर नाल्याची हीच अवस्था आहे़>धारावीतील नाले तुंबलेले विभागांतर्गत नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहेत़ धारावी विभागांतर्गत नाले आजही गाळाने भरलेले आहेत़ धारावी क्रॉस रोडवरील अनेक वस्त्यांचे सांडपाणी या नाल्यात सोडले जाते़ त्यामुळे येथे कचरा साचलेला असतो़ परिणामी, नाल्यातील सांडपाणी वाहून जात नाही़ दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव हा त्रास येथेही आहे़ >माटुंगा लेबर कॅम्पदादर-माटुंगा-माहीमहून धारावी खाडीला जोडण्यात आलेला नाला कचऱ्याने भरलेला असतो़ माटुंगा लेबर कॅम्प नाल्यामध्ये सफाईनंतरही कचरा दिसून येतो़ त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती आहे़ या नाल्याच्या सफाईचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रखडला होता़ तसेच जी उत्तर व जी दक्षिण या प्रभागात हा प्रस्ताव रखडल्यामुळे या कामाला विलंबच झाला़ >नाले उपनगरांतील असो अथवा शहरातील,सर्व ठिकाणी एकच समस्या प्रामुख्याने दिसून आली आहे़ नाल्यांची सफाई केल्यानंतरही स्थानिक रहिवासी नाल्यात कचरा टाकतात़ त्यामुळे नाला पुन्हा प्लॅस्टिक, बांधकामाचे साहित्य अशा टाकाऊ वस्तंूनी भरून जातो़ कुर्ला येथील श्रमजीवी नाला, मालाड येथील कुरार व्हिलेज आणि मालवणी नाला, गोवंडी येथील रफिकनगर नाला, अंधेरीचा मोगरा नाला, वांद्रे येथील बेहरामपाडा आणि एअरपोर्ट नाल्यांमध्ये स्थानिक रहिवासी कचरा टाकत असल्याचे पालिकेला दिसून आले आहे़ घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही वर्षांपूर्वी नाल्यांच्या परिसरातील झोपडपट्टींसाठी कचऱ्याचे डबे बसविण्याची शिफारस केली होती़ या डब्यात नागरिकांनी कचरा टाकल्यास नाला साफ राहील, असा दावा या विभागाने केला होता़ मात्र हा पर्याय प्रशासनाने अमान्य केला़ वारंवार ताकीद देऊनही रहिवासी पालिकेला जुमानत नसल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे़ त्यानुसार नाल्यात कचरा टाकणाऱ्यांकडून २०० ते १००० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे़