शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सलीम अली उद्यानावर राज्य शासनाचा कब्जा

By admin | Updated: April 29, 2016 04:20 IST

ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे.

ठाणे : ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे शासनाचा पैसा लाटण्यासाठी सीआरझेड तीनवर पालिकेने हे उद्यान थाटल्याची माहिती समोर आली आहे. परंतु,याच मुद्यावरुन सोमवारी महासभेत विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा ताबा घेतल्याची माहितीच प्रशासनाला नसल्याची बाबही या निमित्ताने समोर आली. कळव्याला जाताना, खाडीकिनारी हे उद्यान उभारले आहे. सुरवातीला पालिका येथे कचरा टाकत होती. त्यानंतर ही जागा उद्यानात रुपातंरीत करण्यात आली. १४ हेक्टर जागेवर हे उद्यान वसले असून सुरवातीला ऋतुचक्र असे नाव या उद्यानाला दिले होते. परंतु,नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाला डॉ. सलीम अली उद्यान हे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील नाव या उद्यानासाठी निश्चित झाले. परंतु, सीआरझेड तीन बाधीत असलेल्या या जागेवर पालिकेने उद्यान विकसित करुन सुरुवातीला खारफुटीची लागवड केली होती. तसेच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्चही केला. काही वर्षांपूर्वी येथे वृक्ष लागवड व हिरवळीसाठीही लाखोंचा प्रस्ताव पालिकेत वादग्रस्त ठरला होता. ही जागा सीआरझेडने बाधीत असतांना त्यावर एवढा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित करुन याला विरोध झाला होता. परंतु विरोध डावलून पालिकेने हा प्रस्ताव मंजूर केला होता. दरम्यान आजही या उद्यानाचे लोकार्पण झालेले नाही. तसेच, सध्या आतील भागात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. सोमवारीच्या महासभेत एका विषयाच्या अनुषंगाने नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाच्या मुद्याला हात घालून प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले. डॉ. सलीम अली उद्यान शासनाने ताब्यात घेतले आहे, का? असा सवाल त्यांनी केला. तशा स्वरुपाचे फलक उद्यानाच्या ठिकाणी लावल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु याची कल्पना नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने सुरुवातीला दिली.