शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

डॉ. सलीम अली उद्यानावर राज्य शासनाचा कब्जा

By admin | Updated: April 29, 2016 04:20 IST

ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे.

ठाणे : ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे शासनाचा पैसा लाटण्यासाठी सीआरझेड तीनवर पालिकेने हे उद्यान थाटल्याची माहिती समोर आली आहे. परंतु,याच मुद्यावरुन सोमवारी महासभेत विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा ताबा घेतल्याची माहितीच प्रशासनाला नसल्याची बाबही या निमित्ताने समोर आली. कळव्याला जाताना, खाडीकिनारी हे उद्यान उभारले आहे. सुरवातीला पालिका येथे कचरा टाकत होती. त्यानंतर ही जागा उद्यानात रुपातंरीत करण्यात आली. १४ हेक्टर जागेवर हे उद्यान वसले असून सुरवातीला ऋतुचक्र असे नाव या उद्यानाला दिले होते. परंतु,नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाला डॉ. सलीम अली उद्यान हे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील नाव या उद्यानासाठी निश्चित झाले. परंतु, सीआरझेड तीन बाधीत असलेल्या या जागेवर पालिकेने उद्यान विकसित करुन सुरुवातीला खारफुटीची लागवड केली होती. तसेच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्चही केला. काही वर्षांपूर्वी येथे वृक्ष लागवड व हिरवळीसाठीही लाखोंचा प्रस्ताव पालिकेत वादग्रस्त ठरला होता. ही जागा सीआरझेडने बाधीत असतांना त्यावर एवढा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित करुन याला विरोध झाला होता. परंतु विरोध डावलून पालिकेने हा प्रस्ताव मंजूर केला होता. दरम्यान आजही या उद्यानाचे लोकार्पण झालेले नाही. तसेच, सध्या आतील भागात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. सोमवारीच्या महासभेत एका विषयाच्या अनुषंगाने नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाच्या मुद्याला हात घालून प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले. डॉ. सलीम अली उद्यान शासनाने ताब्यात घेतले आहे, का? असा सवाल त्यांनी केला. तशा स्वरुपाचे फलक उद्यानाच्या ठिकाणी लावल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु याची कल्पना नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने सुरुवातीला दिली.