शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

बडेजावपणातून डोकावतोय आजही ‘हुंडा’

By admin | Updated: May 5, 2017 02:29 IST

लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर हुंड्यासाठी विवाहितांचा छळ करण्याचा प्रकार कमी होत नसून वाढतच असल्याचे सामाजिक वास्तव पुढे येत

महेंद्र कांबळे / बारामतीलग्नापूर्वी अथवा लग्नानंतर हुंड्यासाठी विवाहितांचा छळ करण्याचा प्रकार कमी होत नसून वाढतच असल्याचे सामाजिक वास्तव पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाडा येथील एका मुलीने हुंडा देऊ शकत नाही, बापाला त्यासाठी कर्ज काढावे लागू नये, यासाठी विहीरीत जीव दिला. या घटनेने राज्य हदरले. हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पारंपरिक रीतीरिवाज, बडेजावपणा मिरवण्याची सवय असलेल्या मंडळींची मानसिकता अद्याप बदलायला तयार नाही. सामाजिकदृष्ट्या हुंड्यासाठी होणारा स्त्रियांचा छळ ही बाब नक्कीच संवेदनशील आहे. आता यावर तरुणांनी चर्चा करण्यापेक्षा व्यापक मोहीम हाती घेतली पाहिजे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.हुंडा प्रथेच्याविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी आतापर्यंत आवाज उठविला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातदेखील महापुरुषांनीदेखील या प्रथेला छेद देण्याचा प्रयत्न केला. परंतु, २१ व्या शतकातदेखील विवाहितांचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या घटना कमी होत नसल्याचे बारामती पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता  दिसून येते. बारामती शहरातील युवक विपुल पाटील यांची ‘कुणाचा बैल विकायचा आहे का...’ ही सोशल मीडियावरील पोस्ट सर्वाधिक चर्चेची ठरली. पाटील यांनी तयार केलेली पोस्ट अशी आहे. काही दिवसांपूर्वी एका कृषिकन्येने आपल्या शेतकरी बापाला हुंड्याची झळ बसू नये, यासाठी आत्महत्या केली. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर अनेकांचे संदेश वाचले. अनेकांनी त्यामध्ये हळहळ व्यक्त केली आहे, हे वाचून मनाला एक प्रकारची झिरड आली.महाराष्ट्रात दरवर्षी हजारो बैल विकायला निघतात. आई-बाप आपल्या दिवट्याला सजवून धजवून लग्नाच्या बाजारात उभा करतात. त्यांचे सरासरी दर पुढीलप्रमाणे असतात. डॉक्टर : १० लाख, सरकारी अधिकारी : १५ लाख, सरकारी नोकर : ५ लाख, अभियंता : ३ लाख, परमनंट शिक्षक : ३ लाख अशी पाटील यांनी पोस्ट तयार केली आहे. युवकांमधून ही पोस्ट सर्वाधिक व्हायरल केली जात आहे.अ‍ॅड. प्रियांका काटे यांनी सांगितले, की आजही हुंडा घेण्याची मानसिकता प्रत्येक समाजात दिसून येते. हुंडा केवळ पैशातच घेतला जातो, असे नाही. तर पैशांबरोबरच वस्तू, दागिने, वाहन आदींची मागणी वधू कुटुंबीयांकडे केली जाते. मागणी पूर्ण न झाल्यास वधूचा मानसिक, शारीरिक पातळीवर छळ केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. सुशिक्षित परिवारामध्येदेखील हे प्रकार घडतात. त्यातून विवाहितेच्या आत्महत्येपर्यंत प्रकार घडतात. अनेकदा रीतीरिवाज सांभाळण्यासाठी हुंडा घेतला जातो. वास्तविक विवाह करताना मुलगी तिचे घरदार सोडून पतीकडे येते. तिची हुंडा मागून वस्तूप्रमाणे किंमत करणे योग्य नाही.बारामती येथील स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख अंजली वाघमारे म्हणाल्या, की हुंडा मागणी करण्याचे प्रमाण सध्या ७० ते ८० टक्के आहे. केवळ हुंंडा शब्दाचा अर्थ मात्र बदलला आहे. हुंड्याऐवजी घर बांधण्यासाठी पैसे, पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे, पतीला वाहन घेण्यासाठी पैशांची अनेकदा मागणी केली जाते. मागणी पूर्ण न झाल्यास विवाहितेला मारहाण केली जाते, छळ केला जातो. स्त्री आधार केंद्राकडे तक्रार आल्यानंतर पती-पत्नी दोघांच्या कुटुंबीयांना बोलाविले जाते. दोन्ही कुटुुंबातील सदस्यांबरोबर चर्चा आणि पती-पत्नींचे समुपदेशन याद्वारे संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर कौटुंबिक वाद संपुष्टात येतो. मात्र, वाद न सुटल्यास कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला जातो, असे वाघमारे म्हणाल्या.सर्वधर्मीय वधू-वर सूचक मंडळाचे समन्वयक मंगेश इंगळे यांनी सांगितले, की मंडळाच्या वतीने नातेसंबंध जुळविण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजची तरुण पिढी उच्चशिक्षित होण्यासाठी प्राधान्य देते. चांगले करिअर घडविताना मुला-मुलींचे विवाहाचे वय ओलांडून जाते. त्यातून विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींचे वय वाढले आहे. त्यामुळे ऐच्छिक स्थळ मिळत नाही. त्यासाठी वधू-वर सूचक मंडळाची मदत घेतली जाते. हुंडा घेण्यापेक्षा मुला-मुलींनी त्यांचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावे, अशी मानसिकता असणाऱ्या पालकांची संख्या अधिक आहे, असे इंगळे यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. ज्या पद्धतीने छेडछाडीच्याविरोधात पोलीस कार्यरत असतात. महाविद्यायलीन तरुणींना मार्गदर्शन करतात. त्याच पद्धतीने नवविवाहितांचादेखील छळामुळे जीव जाऊ नये, यासाठी त्या मुलीच्या पालकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.हुंड्यासाठी छळ : सामाजिक संकटबारामती शहर पोलीस ठाण्यात मागील वर्षी महिलांच्यासंदर्भात २४ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या २ नवविवाहित महिलांनी आत्महत्या केल्या, तर दोघींनी छळाला कंटाळून पोलिसांत फिर्याद दाखल केली. २०१७ मध्ये ५ महिन्यांतच छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ३ विवाहित आहेत, तर ११ महिलांनी सासरच्या छळाला कंटाळून फिर्याद दाखल केली. ही एका पोलीस ठाण्याची आकडेवारी आहे. त्यामुळेच याची तीव्रता एक सामाजिक संकट म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे.