शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सभापती जाणणार डोंबिवलीच्या व्यथा!

By admin | Updated: June 29, 2016 03:06 IST

महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे.

कल्याण : महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे. आयुक्त ई. रवींद्रन डोंबिवलीतील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात येतात. मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला आहे. त्यामुळे महापौर गेले कुणीकडे?, असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. परंतु, आता जुलैपासून स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी स्थायीच्या बैठकीच्या दिवशी दुपारी या कार्यालयात बसण्याचा निर्णय घेतला आहे.डोंबिवली विभागीय कार्यालयांतर्गत ग, फ, ह आणि ई प्रभाग आहेत. डोंबिवलीसाठी पूर्णवेळ उपायुक्त नेमावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु, आजतागायत ती पूर्ण झालेली नाही. २०१०च्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पूर्णवेळ उपायुक्त नेमण्याची घोषणा तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केली होती. मात्र २०१५ निवडणूक होऊनही याची अंमलबजावणी झालेली नाही. जे उपायुक्त नेमले जातात, ते डोंबिवलीला फिरकतही नाहीत. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी कल्याणला महापालिकेचे मुख्यालय गाठावे लागते. त्यामुळे आयुक्त रवींद्रन दरमहिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोंबिवली कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतात. परंतु, त्या दिवशी महासभा अथवा अन्य काही महत्त्वाचे काम आल्यास तेही डोंबिवलीत येत नाहीत. महापौरपदी निवडून आल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवली दौऱ्यात महिन्यातून एक दिवस डोंबिवलीत येऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या अगोदर महापौर कल्याणी पाटील यांनीही असा दावा केला होता. परंतु, कालांतराने त्यांनी त्याचा विसर पडला. तोच कित्ता देवळेकर गिरवत आहेत. (प्रतिनिधी)>दुपारी ३ च्या सुमारास भेटणारडोंबिवलीला कोणी वाली नसल्याने आता गायकर येथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. स्थायी समितीची बैठक ते सकाळी ११ वाजता घेणार आहेत. ती आटपून दुपारी ३ च्या सुमारास ते डोंबिवली विभागीय कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, एकंदरीत यापूर्वीचा अनुभव पाहता अन्य पदाधिकाऱ्यांप्रमाणेच त्यांनीही केलेला दावा कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील समस्या गंभीर : पदाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी शहराला दाखविलेली पाठ पाहता येथील अधिकारी आणि बेफीकीर झाले आहेत. यात फेरीवाला, अतिक्रमण, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहेत. शहर स्वच्छतेचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.