शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

रोजंदारी २00; डाळ मात्र १0३ रुपयांना!

By admin | Updated: August 25, 2016 01:36 IST

.१0३ रुपयांची एक किलो तूरडाळ घेऊन फक्त वरणच खात बसायचे काय? असा सवाल पौड येथील बीपीएल शिधापत्रिकाधारक बाळू काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

बापू बैैलकर,

पुणे- दिवसभर कष्ट करून कधीतरी २०० रुपये मिळतात...१0३ रुपयांची एक किलो तूरडाळ घेऊन फक्त वरणच खात बसायचे काय? असा सवाल पौड येथील बीपीएल शिधापत्रिकाधारक बाळू काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यातील १५ गोदामांमधून १३ तालुक्यांतील १ लाख ८३ हजार ५०८ लाभार्थ्यांसाठी रेशनवर तूरडाळ वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, १०३ रुपयांना किलो या दराने ती मिळणार असल्याने लाभार्थी ती घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूरडाळीची मोठ्या प्रमाणात साठेबाजी झाल्याने काही महिन्यांपूर्वी डाळीचे दर १८० रुपयांपर्र्यंत गेले होते. राज्य सरकारने ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करून हजारो क्विंटल तूरडाळीचा साठा जप्त केला होता. जप्त केलेली डाळ १०० रुपये भावाने खुल्या बाजारात आणण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, त्याला यश आले नाही. त्यामुळे आता शासनाने गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून माफक दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांत बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना महिन्याला एक किलोप्रमाणे वाटप होणार आहे. १0३ रुपये किलो या दराने ती वाटली जाणार आहे. जिल्ह्यासाठी १८३१ क्विंटल म्हणजे १ लाख ८३ हजार ५0८ किलोचा पुरवठा झाला असून, तो १५ गोदामांमध्ये आला आहे.. तालुक्यातून शिधा पत्रिकाधारकांच्या संख्येप्रमाणे वाटप सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्याप दुकानदारांनी माल उचलला नाही. कारण ती डाळ माथी पडण्याची शक्यता आहे. स्वस्त धान्य दुकानातून एका कुटुंबास १ किलो डाळ देण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून आहेत. १0३ रुपये किलोप्रमाणे चलन भरून घेतले जात आहे. मात्र, एकवेळी बीपीएल कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने ते डाळ घेतील, मात्र अंत्योदय शिधापत्रिकाधारक हे निराधार असल्याने त्यांच्या कुटुंबात एकच सदस्य असल्याने त्यांना १0३ रुपये कसे परवडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रेशनवर ही डाळ गेली, तरी ती उचचली जाणार नसल्याने दुकानदारांच्या माथी ही डाळ पडणार आहे. त्यातच खुल्या बाजारात डाळीचे भाव कमी असताना गरीब लोक ही डाळ घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाकीचे धान्य २ व ३ रुपयांनी मिळत असेल व तूरडाळ खुल्या बाजारात ९५ रुपयांना उपलब्ध असेल, तर ८ रुपये जास्तचे देऊन गरीब लोक ती खरेदी करणार नाहीत. मुळशी तालुक्यातील सर्व दुकानदारांनी चलन भरले आहे, मात्र साठा उचललेला नाही. ही डाळ विक्री होणार की नाही हे अद्याप सांगता येत नाही. - धनंजय दाभाडे, अध्यक्ष, मुळशी, रेशन दुकानदार संघटना