शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

आत्मक्लेश यात्रा मंत्रालयाच्या दारात

By admin | Updated: May 30, 2017 04:53 IST

केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सोमवारी मंत्रालयावर धडकण्यासाठी दक्षिण मुंबईत दाखल झाली. सरकारने शेतकऱ्यांना अडवल्यास ‘अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ऊन सोसत नसल्याने ते यात्रेत सहभागी न झाल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असे आव्हान शेट्टी यांनी सरकारला दिले. सात-बारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी त्यांच्या मागण्या आहेत. पुण्याच्या फुले वाड्यापासून १९० किलोमीटरचा प्रवास यात्रेने केला आहे. राजू शेट्टी यांच्या सौरभ या मुलाला आज उष्णतेमुळे चक्कर आली. आधी सरकारचा पाठिंबा काढून शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढावी, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. १ जूनला संप होणारचमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तरच इतर मागण्यांबाबत चर्चेसाठी मुंबईत जाऊ, अन्यथा नाही. पुणतांबा येथे येऊन मुख्यमंत्र्यांनी संपकरी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत किसान क्रांती समिती व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावला. त्यांनी १ जूनपासून संपाची तयारी चालवली आहे.संघर्ष यात्रेने प्रश्न सुटणार नाहीतसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. केवळ संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात पत्रकारांना सांगितले. मुंबई हादरवूमोदी सध्या बाहुबली चित्रपटातील ‘बल्लाळ देव’ बनले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर आम्ही ‘एनडीए’त आलो. मात्र, आमचा भ्रमनिरास झाला. आंदोलनात २५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. आम्ही मुंबई हादरवून सोडू.- खा. राजू शेट्टीराज्यपालांनी दिली वेळ राज्यपाल विद्यासागर राव यांनी शेट्टी यांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भेटीची वेळ दिली आहे.