शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथं २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

नाशिक -  Narendra Modi in Nashik ( Marathi News ) स्थानिक उत्पादनाला चालना द्या, मेड इन इंडिया उत्पादनाला प्राधान्य द्या. कुठल्याही ड्रग्सच्या आहारी जाऊ नका. तुमच्या जीवनापासून ते दूर ठेवा. आई बहिणींवरून अपशब्द, शिवीगाळ केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उचला. ते बंद करा. आपल्या देशातील प्रत्येक युवा त्यांची जबाबदारी निष्ठेने आणि सामर्थ्याने पूर्ण करेल हा विश्वास आहे. सशक्त भारताची जी ज्योत आम्ही पेटवली आहे ती अमृतकाळात अमरज्योत बनवा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आवाहन केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथं २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदी म्हणाले की, माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवा पिढीवर आहे. युवक ज्यारितीने देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडला जातोय त्यामुळे मी उत्साहित आहे. 'मेरा युवा भारत' संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. संघटनेला स्थापन होऊन ७५ दिवसही झाले नाही तोवर आतापर्यंत १ कोटी १० लाख युवकांनी नोंदणी केली आहे. तुमचे सामर्थ्य, सेवाभाव देशाला, समाजाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. तुमचे प्रयत्न, मेहनत ही युवा भारताच्या शक्तीचा संपूर्ण जगात झेंडा रोवणार आहे. मी युवकांचे विशेष अभिनंदन करतो. 'माय भारत' नोंदणीत युवक-युवतींमध्ये स्पर्धा सुरू आहे. आमच्या सरकारला १० वर्ष पूर्ण होतायेत. या १० वर्षात आम्ही युवकांच्या पंखाना बळ देण्याचं काम केले आहे. शिक्षण, रोजगार, स्टार्टअप, कौशल्य विकास यासारख्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात आधुनिक इको सिस्टम तयार करत आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात नवनवीन आयआयटी, एनआयटी सातत्याने खुले होत आहेत. आज पूर्ण जग भारताला कौशल्य विकासाच्या दृष्टीने पाहतंय. परदेशात जाणाऱ्या युवकांसाठी सरकार प्रशिक्षण देत आहे. फ्रान्स, जर्मनी, यूके, इटली, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांसोबत भारत सरकारने करार केलेत त्याचा लाभ भारतीय युवकांना मिळत आहे. सरकार प्रत्येक क्षेत्रात ताकदीने काम करत आहे. एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर विकसित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मागच्या सरकारच्या तुलनेत तिप्पटीने काम केले जात आहे. नवे महामार्ग, नव्या ट्रेन्स कुणासाठी बनतंय तर ते युवकांच्या विकासासाठी होतंय असंही मोदी यांनी म्हटलं. 

दरम्यान, भारतातील युवकांना सर्वात स्वस्त मोबाईल डेटा मिळत आहे. आज देशाचे भविष्य युवा आहे. युवा वर्ग मागे कधी राहत नाही. तो स्वत: नेतृत्व करायला पुढे येतो. तंत्रज्ञान क्षेत्रातही भारत जगाचे नेतृत्व करायला लागला आहे. मेड इन इंडिया, आयएनएस विक्रांत, चंद्रयान यासारखं यश आपण मिळवले आहे. आज भारतात मोठमोठ्या मॉलपासून रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत यूपीआय पेमेंट घेतले जाते. अमृतकाळात युवकांना भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. आता आपल्याला केवळ समस्यांचे समाधान शोधायचे नाही तर आपल्याला नवे चॅलेंज निर्माण करायचे आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताला बनवायचे आहे. आपल्याला सर्व्हिस, आयटी सेक्टरसह जगातील मॅन्युफॅक्चरिंग हब भारताला बनवायचे आहे. आपल्याला टार्गेट ठेऊन निश्चित काळात ते ध्येय गाठायचे आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना सांगितले. 

देशाच्या भविष्यासाठी मतदान करा

देशातील युवा पिढी गुलामीच्या प्रभावापासून मुक्त आहे. विकास आणि वारसा युवकांना हवा आहे. योग, आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. स्वातंत्र्यानंतर  या गोष्टी विस्मरणात गेल्या परंतु आज जगात ही आपली ओळख बनतेय. मी जेव्हाही ग्लोबल नेत्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात मोठी आशा दिसते. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत युवकांची भागीदारी जितकी जास्त असेल तितके राष्ट्रासाठी मोठे योगदान असेल. जर युवा सक्रीय राजकारणात आले तर घराणेशाही संपुष्टात येईल. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे किती नुकसान झाले हे सगळ्यांना माहिती आहे. तुमची भूमिका मतांच्या माध्यमातून जाहीर करा. पहिल्यांदा मतदान करणारे युवा देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. देशाच्या भविष्यासाठी तुम्हाला मत देणे गरजेचे आहे. पुढील २५ वर्षाचा अमृतकाळ तुमच्यासाठी कर्तव्यकाळ आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी