शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:06 IST

छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो असं संभाजीराजेंनी सांगितले.

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केला. राज यांच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांनी राज ठाकरे खोटे बोलत असून टिळकांनी समाधीसाठी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नाही असं सांगितले आहे. आता याप्रकरणी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे.

छ. संभाजीराजे(Sambhaji Chhatrapati) म्हणाले की, कुणीही जबाबदार व्यक्तीने इतिहास मांडतांना पुरावे धरून मांडावे. राज ठाकरेंनी जे विधान केले ते चुकीचे आहे. शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही. इतिहासाबाबत १०० टक्के माहिती नसेल तर बोलू नये. छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो. महात्मा फुले यांनी समाधी शोधली. समाधी बांधण्याचं श्रेय शिवभक्तांचे आहे असं सांगत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

तर शरद पवार काय बोलतात, राज ठाकरे काय बोलतात यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. शाहू महाराजांचा आहे. महात्मा फुले, आंबेडकरांचा आहे. महापुरुषांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी त्या दोघांचा प्रवक्ता नाही. त्यांच्या विधानावर मी का प्रतिक्रिया देऊ. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. त्यावर बोलेन असं सांगत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी-मनसे या वादावर बोलण्यास नकार दिला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं कधी नाव घेत नाहीत असं म्हटलं. त्याचसोबत फुले-शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहेच परंतु त्याआधी तो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला. रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली हे शरद पवार कधी सांगत नाहीत असंही राज ठाकरेंनी दावा केला होता.

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय

राज ठाकरेंच्या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी नेत्यांनी टिळकांनी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नसल्याचं म्हटलं. त्यावर लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaj Thackerayराज ठाकरे