शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:06 IST

छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो असं संभाजीराजेंनी सांगितले.

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केला. राज यांच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांनी राज ठाकरे खोटे बोलत असून टिळकांनी समाधीसाठी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नाही असं सांगितले आहे. आता याप्रकरणी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे.

छ. संभाजीराजे(Sambhaji Chhatrapati) म्हणाले की, कुणीही जबाबदार व्यक्तीने इतिहास मांडतांना पुरावे धरून मांडावे. राज ठाकरेंनी जे विधान केले ते चुकीचे आहे. शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही. इतिहासाबाबत १०० टक्के माहिती नसेल तर बोलू नये. छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो. महात्मा फुले यांनी समाधी शोधली. समाधी बांधण्याचं श्रेय शिवभक्तांचे आहे असं सांगत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

तर शरद पवार काय बोलतात, राज ठाकरे काय बोलतात यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. शाहू महाराजांचा आहे. महात्मा फुले, आंबेडकरांचा आहे. महापुरुषांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी त्या दोघांचा प्रवक्ता नाही. त्यांच्या विधानावर मी का प्रतिक्रिया देऊ. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. त्यावर बोलेन असं सांगत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी-मनसे या वादावर बोलण्यास नकार दिला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं कधी नाव घेत नाहीत असं म्हटलं. त्याचसोबत फुले-शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहेच परंतु त्याआधी तो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला. रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली हे शरद पवार कधी सांगत नाहीत असंही राज ठाकरेंनी दावा केला होता.

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय

राज ठाकरेंच्या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी नेत्यांनी टिळकांनी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नसल्याचं म्हटलं. त्यावर लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaj Thackerayराज ठाकरे