शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:06 IST

छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो असं संभाजीराजेंनी सांगितले.

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केला. राज यांच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांनी राज ठाकरे खोटे बोलत असून टिळकांनी समाधीसाठी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नाही असं सांगितले आहे. आता याप्रकरणी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे.

छ. संभाजीराजे(Sambhaji Chhatrapati) म्हणाले की, कुणीही जबाबदार व्यक्तीने इतिहास मांडतांना पुरावे धरून मांडावे. राज ठाकरेंनी जे विधान केले ते चुकीचे आहे. शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही. इतिहासाबाबत १०० टक्के माहिती नसेल तर बोलू नये. छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो. महात्मा फुले यांनी समाधी शोधली. समाधी बांधण्याचं श्रेय शिवभक्तांचे आहे असं सांगत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

तर शरद पवार काय बोलतात, राज ठाकरे काय बोलतात यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. शाहू महाराजांचा आहे. महात्मा फुले, आंबेडकरांचा आहे. महापुरुषांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी त्या दोघांचा प्रवक्ता नाही. त्यांच्या विधानावर मी का प्रतिक्रिया देऊ. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. त्यावर बोलेन असं सांगत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी-मनसे या वादावर बोलण्यास नकार दिला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं कधी नाव घेत नाहीत असं म्हटलं. त्याचसोबत फुले-शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहेच परंतु त्याआधी तो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला. रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली हे शरद पवार कधी सांगत नाहीत असंही राज ठाकरेंनी दावा केला होता.

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय

राज ठाकरेंच्या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी नेत्यांनी टिळकांनी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नसल्याचं म्हटलं. त्यावर लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaj Thackerayराज ठाकरे