शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

टेंशन नही लेनेका...आपण पासच; साडेचार लाख आजी-आजोबांच्या पेपर तपासणीचे काम सुरू

By अविनाश साबापुरे | Updated: March 20, 2024 13:30 IST

बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरली जाणार असल्याचीही माहिती

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: गत रविवारी राज्यात प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली, तर परीक्षेनंतर लगेचच केंद्र शासनाने उत्तीर्णतेचे निकष शिथिल केले. १५० पैकी पूर्वी ५१ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते; परंतु सुधारित निकषानुसार आता ४९.५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण केले जाणार आहे. तसेच यापेक्षाही कमी गुण असणाऱ्या प्रौढांना अनुत्तीर्ण असा शेरा न देता ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा असलेले गुणपत्रक दिले जाणार आहे.

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी १७ मार्च रोजी महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेत तब्बल चार लाख ५६ हजार ७४८ प्रौढांनी हजेरी लावली. ही उपस्थिती उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३ टक्के होती. उत्तीर्णतेसाठी पूर्वी वाचन, लेखन व संख्याज्ञान या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १७ गुणांची अट देण्यात आली होती, तर एकूण १५० पैकी ५१ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक होते. आता सुधारित निकषानुसार या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १६.५ गुण, तर एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहे. पेपर तपासणीचे काम सुरू झाले असून, सुधारित निकषाबाबत योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी निर्देश जारी केले आहेत. सुधारित निकषानुसारच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर होणार आहे.

बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरणार

  • नवभारत साक्षरतेच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणदानाबाबत केंद्र शासनाने सुधारित निकष दिले.
  • त्यानुसार, प्रौढांनी प्रमाणभाषेऐवजी आपल्या बोलीभाषेत उत्तरे लिहिली असतील, तरी त्यांना गुणदान करण्याच्या सूचना आहेत. 
  • तसेच उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण पडत असल्यास ५ ग्रेस गुण दिले जाणार आहेत.
  • यानंतरही कोणी अनुत्तीर्ण होत असल्यास त्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असे गुणपत्रक दिले जाणार आहे.

हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही त्यांना येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :examपरीक्षा