शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 11:15 IST

शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव - शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असं होत नाही. तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे असंही त्यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला लगावत आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असंही त्यांनी सांगितले. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजेपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकून ते बाहेर येणारचं नाहीत, असे ठेचले पाहिजेत अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी पीएफआय कार्यकर्त्यांचा समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, या देशाचं अन्न खायचं. हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे. मला तर असं वाटतं कोणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो पहिले देश महत्वाचा आहे असं असतांना जर देशाच्या बाबतीत अशी घोषणाबाजी होत असेल तर सरकारची आणि आपली जबाबदारी आहे की अशा वृत्तीला ठेचून टाकलं पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी होत असल्याचं मी पण चॅनलवर पाहिलं, हाच मोठा पुरावा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

घाबरायचं नसतं काम करत राहायचंजळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा ४४० कोटी रुपयांचा आहे. मार्च अखेर हे पैसे खर्च कसे होतील याचं नियोजन करणे याला आपलं प्राधान्य असेल. जिल्ह्यातील ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामांवरील स्थगिती उठवणे व त्यांना चालना देणे याला आपलं प्राधान्य असेल. आपल्याला जो रोल मिळाला तो निभाण्याचा माझा प्रयत्न असतो. मंत्री हा राज्याचा असतो जिल्ह्याचा नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अतिरिक्त जबाबदारीचा ताण येणार नसल्याचे सांगितले, एक जिल्हा काय आणि दोन जिल्हे काय घाबरायचं नसतं, काम करत राहायचं असं गुलाबराव पाटील म्हणाले.