शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 11:15 IST

शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव - शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असं होत नाही. तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे असंही त्यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला लगावत आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असंही त्यांनी सांगितले. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजेपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकून ते बाहेर येणारचं नाहीत, असे ठेचले पाहिजेत अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी पीएफआय कार्यकर्त्यांचा समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, या देशाचं अन्न खायचं. हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे. मला तर असं वाटतं कोणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो पहिले देश महत्वाचा आहे असं असतांना जर देशाच्या बाबतीत अशी घोषणाबाजी होत असेल तर सरकारची आणि आपली जबाबदारी आहे की अशा वृत्तीला ठेचून टाकलं पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी होत असल्याचं मी पण चॅनलवर पाहिलं, हाच मोठा पुरावा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

घाबरायचं नसतं काम करत राहायचंजळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा ४४० कोटी रुपयांचा आहे. मार्च अखेर हे पैसे खर्च कसे होतील याचं नियोजन करणे याला आपलं प्राधान्य असेल. जिल्ह्यातील ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामांवरील स्थगिती उठवणे व त्यांना चालना देणे याला आपलं प्राधान्य असेल. आपल्याला जो रोल मिळाला तो निभाण्याचा माझा प्रयत्न असतो. मंत्री हा राज्याचा असतो जिल्ह्याचा नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अतिरिक्त जबाबदारीचा ताण येणार नसल्याचे सांगितले, एक जिल्हा काय आणि दोन जिल्हे काय घाबरायचं नसतं, काम करत राहायचं असं गुलाबराव पाटील म्हणाले.