शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 11:15 IST

शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव - शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असं होत नाही. तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे असंही त्यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला लगावत आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असंही त्यांनी सांगितले. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजेपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकून ते बाहेर येणारचं नाहीत, असे ठेचले पाहिजेत अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी पीएफआय कार्यकर्त्यांचा समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, या देशाचं अन्न खायचं. हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे. मला तर असं वाटतं कोणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो पहिले देश महत्वाचा आहे असं असतांना जर देशाच्या बाबतीत अशी घोषणाबाजी होत असेल तर सरकारची आणि आपली जबाबदारी आहे की अशा वृत्तीला ठेचून टाकलं पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी होत असल्याचं मी पण चॅनलवर पाहिलं, हाच मोठा पुरावा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

घाबरायचं नसतं काम करत राहायचंजळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा ४४० कोटी रुपयांचा आहे. मार्च अखेर हे पैसे खर्च कसे होतील याचं नियोजन करणे याला आपलं प्राधान्य असेल. जिल्ह्यातील ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामांवरील स्थगिती उठवणे व त्यांना चालना देणे याला आपलं प्राधान्य असेल. आपल्याला जो रोल मिळाला तो निभाण्याचा माझा प्रयत्न असतो. मंत्री हा राज्याचा असतो जिल्ह्याचा नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अतिरिक्त जबाबदारीचा ताण येणार नसल्याचे सांगितले, एक जिल्हा काय आणि दोन जिल्हे काय घाबरायचं नसतं, काम करत राहायचं असं गुलाबराव पाटील म्हणाले.